माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…..
१-आजपासुन पुढील १५ दिवस म्हणजे ३१ मे पर्यन्त म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनपूर्व (मान्सून चा नव्हे) वीजा, वारा वावधनासहितचा केवळ मान्सूपूर्व वळवाचा गडगडाटी पावसाची शक्यता जाणवते.
२-मुंबई समोर अरबी समुद्रात केंद्र असलेले एक व तेलंगणा राज्यावर केंद्र असलेले असे दुसरे अश्या दोन आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या संयोगातून (टकरीतून) सध्या वळवाच्या पावसाची ही शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अश्या चौदा जिल्ह्यात ह्या वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune