माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१- मान्सून –
केरळात मान्सून २३ ते ३१ मे दरम्यान कधीही केरळात दाखल होऊ शकतो.
२- अंदमानातील सध्याचा पाऊस –
अंदमान व आग्नेय बंगाच्या उपसागरात दाखल झालेला मान्सून चांगला कोसळत असून त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत आहे.
३-महाराष्ट्रातील पाऊस व पेरणी पूर्व मशागती-
आजपासुन पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सून चा नव्हे परंतु मान्सूनपूर्व वीजा, वारा वावधनासहितचा मान्सूपूर्व अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. त्यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरणीपूर्व शेतीच्या मशागतींना चालना मिळू शकते, शेतकऱ्यांनी त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपूर्व मशागतीस तयारीतच असावे, असे वाटते.
४- महाराष्ट्रातील तापमाने-
अवकाळीच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता आहे.
अर्थात ४-५ दिवसासाठी तापमानात थोडी चढ-उतार जरी जाणवली तरी एकंदरीत उर्वरित मे महिन्यात दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही, असेच वाटते. हे सर्व असले तरी सध्याच्या वातावरणात एकाकी काही बदल झाला तर तसे अवगत करता येईल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune