नाशिक – केंद्र सरकारने केलेल्या आवाहनानुसार हर घर टीका हर घर दस्तक या अभियानाला त्र्यंबकेश्वर तालुक्यातून प्रारंभ झाला आहे. कोरोना लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांची यादी या अभियानाअंतर्गत तयार करण्यात येत आहे. त्यानंतर गरजेनुसार प्रत्येक गावात कोरोना लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून त्र्यंबक तालुक्यातील पेगलवाडीतील काही घरांमध्ये जाऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान राबविण्यात आले. गावातील एका घरामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या लसीकरण पथकाने विशेष केंद्र सुरू केले. लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांना यावेळी लस देण्यात आली. या अभियानाबद्दल विशेष जनजागृतीही करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ पवार व फडणवीस यांनी केले. तसेच, काही घरांमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार प्रीतम मुंडे लसीकरणाबाबत जनजागृती मध्ये सहभाग घेतला.
लसीकरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ कैलास भोये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोतीलाल पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र अंजनेरीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ रेखा सोनवणे, डॉ आशिष सोनवणे, तालुका पर्यवेक्षक श्री राजेंद्र भानोसे आरोग्य सेवक श्री किशोर अहिरे ,अमोल बागुल ,संजय चव्हाण,अपसूंदे आरोग्य सेविका श्रीमती केदारे श्रीमती मिंदेतसेच गावात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक ग्राम आरोग्य अधिकारी इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले