रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रोज सकाळी गोदावरीत स्नान करणाऱ्या पोलिस आयुक्तांना पालकमंत्री भुजबळांनी हाणला हा टोला

by Gautam Sancheti
मार्च 6, 2022 | 5:34 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20220305 WA0023

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दक्षिणेकडील राज्यात कलावंतांना देवाप्रमाणे मानतात इतके की त्यांना मुख्यमंत्री करतात परंतु मराठी माणूस मराठी माणसांना मोठं करण्यात कमी पडतो अशी खंत व्यक्त करतांनाच आयुष्यात निर्मळ मनाने केलेले कार्य यशास प्राप्त ठरते. कारकिर्दीत प्रामाणिकपणा आणि जिद्द यांची सांगड घातल्यास कोणतेही काम अवघड नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. नाशिकमध्ये पार पडलेल्या सुविचार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. गंगापुर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजीत या पुरस्कार वितरण सोहळयाप्रसंगी जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, सुविचार मंचचे अध्यक्ष अशोक खुटाडे, सचिव अ‍ॅड. रविंद्र पगार, संयोजक आकाश पगार उपस्थित होते.

अभिनेते सिध्दार्थ जाधव, पुजा सावंत, अभिनेते चिन्मय उदगीरकर या पुरस्कार सोहळयाचे प्रमुख आकर्षण ठरले. मान्यवरांच्या यावेळी अभिनेते तसेच विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारया मान्यवरांचा सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अभिनेते सिध्दार्थ जाधव यांच्या भाषणातला धागा पकडत म्हणाले, दिसण्यावर काहीच नसतं तर माणसाच्या असणं महत्वाचे आहे. व्यासपीठावरील मराठी कलाकारांचा गौरव करतांना त्यांनी सांगितले की, दक्षिणेकडे अभिनेत्यांना मुख्यमंत्री करतात परंतू आपण आपल्या माणसांना मोठ करण्यात कमी पडतो. आपण प्रेम, व्देष राखून करतो. परंतू खरेपणाने यश नक्कीच मिळतं असे सांगत त्यांनी पुरस्कार्थींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, आज सर्वच क्षेत्रात सुविचार दुर्मिळ होत चालला आहे. अशा परिस्थितीत सुविचार मंचने आपल्याच माणसांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे, ही गोष्ट प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. रविंद्र पगार यांनी केले. सुत्रसंचालन संयोजक आकाश पगार यांनी केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, डॉ. शोभा बच्छाव, अशोक खुटाडे आदी उपस्थित होते.

याचां झाला सन्मान
नितीन महाजन (प्रशासन), प्रा. शंकर कापडणीस ( साहित्य), ईश्वरी सावकार (क्रीडा), मधुकर कडलग (शिक्षण), किशोर खैरनार (कृषी), डॉ. अतुल वडगावकर ( वैद्यकीय), हेमंत राठी (उद्योग), चिन्मय उद्गीरकर (कला), पूजा सावंत (कला), सिद्धार्थ जाधव ( कला) यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, सुविचार मंचचे अध्यक्ष ड. अशोक खुटाडे, सचिव ॲड. रवींद्र पगार, प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, समीर भुजबळ, आ. माणिकराव कोकाटे, आ. हिरामण खोसकर, दीपिका चव्हाण आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळांचा आयुक्तांना टोला
आपल्या खास शैलीत भाषण करतांना पालकमंत्री भुजबळ यांनी दूरसंचार क्षेत्र आणि पोलीस आयुक्तांवर कोटी केल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. भुजबळ म्हणाले, नाशिकच्या नितीन महाजन यांनी नाशिक दूरसंचार देशात एक क्रमांकावर आणले आहे. मात्र केंद्र सरकारने रेल्वे, विमान कंपनीचे खासगीकरण केले. अगदी अलीकडेच विमान कंपनीही गेली. त्यामुळे ते दूरसंचारही केव्हा विकतील, याचा नेम नाही असा टोला हाणला. अर्थात दिल्लीकरांची कृपादृष्टी असल्याशिवाय ते शक्य नाही ही भावना तिथपर्यंत पोहचवा असेही ते म्हणाले. तर दररोज गोदावरीत स्नान करणारया आयुक्तांना गोदा प्रदुषणमुक्त करण्यासाठी हातभार लावा अन रामकुंडात स्नान करा असा टोलाही त्यांनी हाणला.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अविचार न करता सुविचार करा असा संदेश देत ‘सुविचार मंच’ नाशिक ही सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारी संस्था असून लोकमनाच्या सुखदु:खात सहभागी होऊन त्यांना भावनिक आधार देण्याचे काम करत आहे.संस्थेच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी काम करत असून आकाश पगार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी युवक गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी ‘देव द्या देवपण घ्या’ हा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम राबवीत आहे.ही अतिशय गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंना सुविचार गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिकची सर्व नवरत्न असून नाशिक कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रात अतिशय अग्रेसर आहे.

जयंत पाटील म्हणतात केसावर फुगे
जलसंपदामंत्री जयंत पाटील हे भाषणासाठी उभे राहीले. भाषणाला सुरूवात करतांना त्यांनी अभिनेता सिध्दार्थ जाधव याचे कौतुक केले. तसेच जाधव यांनी आपण दिसायला फार चांगले नाही असा उल्लेख केला हा धागा पकडत आपण दिसायला चांगले नाहीत असे कोण म्हणतो आपण जी हेअर स्टाईल केली आहे तिचे मला फार आकर्षण वाटते असे सांगत आपल्या केसावर जो फुगा आला आहे त्याला मला हात लावूशी वाटतो असे सांगताच सिध्दार्थ जाधवनेही आपल्या जागेवर उठून पाटील यांच्याकडे धाव घेतली यावेळी सिध्दार्थच्या केसावरील फुग्याला जाधव यांनीहात लावताच सभागृहात एकच हशा पिकला.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, सुविचार मंचने सुविचार गौरव पुरस्काराची परंपरा कायम ठेवली आहे. ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. अतिशय कल्पकतेने आकाश पगार यांनी हा सोहळा आयोजित केला ही कौतुकास्पद बाब असून इतक्या मान्यवरांवर एका व्यासपीठावर आणले हे सुविचार मंचचे यश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही मराठी माणसे मराठी कलाकारांना पुढे आणण्यात कमी पडतो आहे. इतर राज्यात कलाकारांना अधिक प्रेम दिलं जातंय. आम्ही मराठी माणूस हात राखून काम करतो अशी खंत असून सिद्धार्थ जाधवचे यश महाराष्ट्रात अतिशय मोठं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अभिनेता सिद्धार्थ जाधव सत्काराला उत्तर देतांना म्हणाला की, मनुष्याकडे जे नसते, त्याचा बाऊ न करता जे आहे, त्याकडे लक्ष दिले तर अधिक यश मिळते. या मोहमयी जगात आकर्षक काहीही शाश्वत नसते. तुमचा स्वभाव आणि दुसर्‍यास आदर देणारी वृत्ती हेच तुमचे सौंदर्य असते. आई वडिलांचे आशीर्वाद घेत एकलव्याप्रमाणे सातत्याने काम केल्यास नक्कीच यश मिळते.

अभिनेता चिन्मय उदगीरकर* याने आपण नाशिककर असल्याचा अभिमान असल्याचे सांगत कलाकार म्हणून काम करत असतांना या शहरासाठी आपण काही तरी देणे लागतो याकरीता नमामि गोदा उपक्रम राबवत असल्याचे सागत नाशिकमध्ये चित्रनगरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. गेली १२ वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत असतांना आज नाशिककरांनी मला जे प्रेम दिल त्याची ॠणी असून सुविचार गौरव पुस्काराने जबाबदारी वाढली असून मला बळ मिळाल्याचे अभिनेत्री पुजा सावंत हिने सांगितले. यावेळी बोलतांना त्यांनी चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास उलगडवून सांगतांना आपले अनुभव कथन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रस्त्यावरच्या खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत ही ६ शहरे; बघा तिथे काय काय मिळते?

Next Post

बुक केलेली घरेही महागणार? बांधकाम साहित्य दरवाढीचा मोठा परिणाम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

बुक केलेली घरेही महागणार? बांधकाम साहित्य दरवाढीचा मोठा परिणाम

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011