नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदीवरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. तर आज झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. तर गोदावरी नदीच्या पात्रालगत रस्त्यावर पार्क केलेली एक कार पाण्यात अडकली. कार ज्या ठिकाणी पार्क केली त्यावेळेस पाणी नव्हते. पण, त्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे ती अडकली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यानंतर गाडी बाहेर काढण्यात यश मिळाले.
गोदावरी नदीच्या पाणी पातळी वाढल्यानंतर भांडी बाजार परिसरातही अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. व्यापा-यांनी तातडीने दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली. भांडी बाजार बरोबरच अनके ठिकाणी गुडघ्याएेवढे पाणी साचले. तर काही ठिकाणी नाल्याचे पाणी रस्त्यावर आले.
दरम्यान पाण्याची पातळी वाढल्यानंतर महापालिकेने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. हवामान विभागाने नाशिकसाठी यलो अटर्ल जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार आहे.