इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरण व गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार दोन दिवसापासून कायम आहे. त्यामुळे आज सकाळी ६ वाजता गंगापूर धरण नदी पूर पाणी विसर्ग ५०० क्यूसेसने सोडण्यात आले. तर सकाळी ९ वाजता १००० क्यूसेस करण्यात येणार आहे. धरणातल्या पाणी आवकानुसार विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावेळी नदीगाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.
गुरुवारी गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे तालुक्यातील नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. गंगापूर धरण परीचालन सुची नुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे येणारा येवा बघता जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे. तसेच पुढील कालावधीत धरणामधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे.
त्यामुळे नागरीकांनी नदीप्रवाहात जावू नये तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.