सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे शहरात घेतला ‘जनता दरबार’….नागरिकांनी मांडल्या समस्या

by India Darpan
फेब्रुवारी 25, 2025 | 6:54 am
in संमिश्र वार्ता
0
वनमंत्री

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत “जनता दरबार” ठाणे शहरातील रघुवंशी हॉल, ८, खारकर आळी रोड, जांभळी नाका, ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला.

या जनता दरबारात ५६० नागरिकांनी आपल्या समस्या वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या. बहुतांशी सामाजिक सद्य:स्थिती, शिक्षण, महिला संरक्षण, पाणीपुरवठा, जनजाती, वन, शेतजमीन या व अशा विविध विषयांबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यापैकी काही निवेदनांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांचे तात्काळ समाधान केले गेले. उर्वरीत तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विहित नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

यावेळी आमदार निरंजन डावखरे व संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील व संदीप चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे, जिल्हा उपनिबंधक डॉ.किशोर मांडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांच्यासह अन्य विविध शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.

यावेळी वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, भारताला सामर्थवान आणि विकसनशील बनविण्याच्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व संरक्षण क्षेत्रातील समस्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे, म्हणून हा “जनता दरबार” भरविण्यात आला. त्याचबरोबर प्रत्येक शासकीय विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा शासनाने ठरवून दिला आहे. या कृती आराखड्यामुळे महाराष्ट्र एका उंच पातळीवर नेऊन ठेवण्याचे काम या जनता दरबाराच्या माध्यमातून केले जाणार आहे. याआधी नवी मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी जनता दरबार झाले असल्याचे सांगून येत्या २८ फेब्रुवारीला नवी मुंबई येथे पुन्हा जनता दरबार होणार असल्याचेही श्री.नाईक यांनी सांगितले.

या जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आलेल्या जनतेला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने पोलीस विभाग व इतर विभागांच्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबाबत वनमंत्री श्री.नाईक यांनी संपूर्ण प्रशासनाचे समाधान व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

आफ्रिदीसोबत माजी मंत्री अनुराग ठाकूर सामना पाहतानाचा फोटो…आदित्य ठाकरे यांनी केली ही टीका

Next Post
Gkj18gwXoAAS6kb e1740463730983

आफ्रिदीसोबत माजी मंत्री अनुराग ठाकूर सामना पाहतानाचा फोटो...आदित्य ठाकरे यांनी केली ही टीका

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011