बुधवार, ऑक्टोबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोदी सरकारचा कारभार नक्की कसा आहे? अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीनेच पुस्तकात केला भांडाफोड.. बघा, काय लिहिलंय त्यात

मे 13, 2023 | 10:43 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
sitharaman

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजात फूट पाडणे, जातीय विद्वेषाचे वातावरण तयार करणे यामध्ये कार्यक्षम असल्याचे खळबळजनक निरीक्षण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने आपल्या पुस्तकात केला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी दिलेली एक मुलाखत चांगलीच गाजत आहे. हा केंद्र सरकारला घरचा आहेर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांच्या ‘The Crooked Timber Of New India : Essays on a Republic in Crisis’ या पुस्तकाचे १५ मे रोजी लोकार्पण होणार आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत अनेक धक्कादायक निरीक्षणं त्यांनी नोंदविली आहेत. विशेष म्हणजे पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत बरीच स्पष्ट मते नोंदवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात अकार्यक्षम कारभार सुरू आहे. पंतप्रधान अर्थव्यवस्थेतच नाही तर इतर अनेक आघाड्यांवर अकार्यक्षम ठरले आहेत, असेही त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

विशेष म्हणजे डॉ. परकला प्रभाकर हे देशाच्या अर्थ्यमंत्र्यांचे पती असून त्यांनी अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘मोदी सरकारच्या काळात सर्वच चुकीचे घडले असे मी म्हणणार नाही. महागाईचा दर सध्या सहा ते सात टक्क्यांच्या घरात आहे. पण बेरोजगारीचा दर सात टक्क्यांच्या वर गेला आहे. युवकांच्या बेरोजगारीचा आकडा यापेक्षा अधिक आहे. अशावेळी डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ, काही घटकांना दिलेले अनुदान अशा चांगल्या बाबी आणि समस्या एकाच चष्म्यातून पाहता येणार नाहीत.

महागाई, युवकांची बेरोजगारी हे आपल्यासमोरचे मोठे प्रश्न आहेत. या परिस्थितीत सरकारी संस्थांचे होणारे खासगीकरण, मागणी आणि पुरवठा यात झालेला कमालीचा गोंधळ यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत कमालीची अनागोंदी माजली आहे,’ असे स्पष्ट मत मत डॉ. परकला प्रभाकर यांनी व्यक्त केले.

नोटाबंदी कुणाच्या सल्ल्याने?
आज मोदी सरकारला कोणते अर्थतज्ज्ञ सल्ला देत आहेत, याची मला कल्पना नाही. कोणत्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला ऐकून त्यांनी नोटाबंदीसारखा अव्यवहार्य निर्णय घेतला, हे कळलेच नाही. काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पण तुम्ही कोणत्याही अर्थतज्ज्ञाला विचारा, काळा पैसा हा रोखीमध्ये असतो का?, असा सवाल डॉ. प्रभाकर यांनी या उपस्थित केला आहे.

अर्थमंत्र्यांवर टीका?
अर्थव्यवस्थेबाबत सरकारचे मंत्री चुकीची माहिती लोकांसमोर ठेवत आहेत. कोरोना महामारीआधी असलेला आपला जीडीपी आणि आजच्या जीडीपीमध्ये खूप अंतर आहे. आपण महामारीच्या आधीचा जीडीपी अद्याप गाठलेला नाही. भारतीय जनता पार्टीकडे सुरुवातीपासून आर्थिक तत्त्वज्ञान किंवा तसा सुसंगत विचार नव्हता. मी कुणा एका व्यक्तीबद्दल हे बोलणार नाही. पंतप्रधानांना जबाबदार धरेन, कारण ते या सरकारचे प्रमुख आहे. देशात चाललेल्या बऱ्या-वाईट घटनांना ते थेट जबाबदार आहेत, असेही अर्थमंत्र्यांचे पती म्हणाले.

देश मूल्यांपासून दूर जातोय
देशात चाललेल्या चुकीच्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. आपला देश सध्या चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. प्रजासत्ताक भारताने आखून दिलेली तत्त्वे आणि मूल्यांपासून आपण दूर जात आहोत. देशात सध्या जे काही चालू आहे, त्यावरून मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मी फक्त देशात काय चुकीचे सुरू आहे ते लोकांसमोर मांडले, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Finance Minister Nirmala Sitharaman Husband Book

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ही महिला बनली ट्विटरची नवी सीईओ… एलन मस्क यांची घोषणा… जाणून घ्या कोण आहे ही पॉवरफुल महिला…

Next Post

अडचणीतील सहकारी बॅंकांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
Next Post
cmo3 e1683957886109

अडचणीतील सहकारी बॅंकांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011