बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्ही फक्त EMI भरत रहा! हे पहा, ५ वर्षात राष्ट्रीय बँकांनी माफ केले एवढे कर्ज

by Gautam Sancheti
डिसेंबर 20, 2022 | 5:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
budget

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय बँका सर्वसामान्यांना सहजासहजी कर्ज देत नाहीत. दिलेच तर अटी आणि कागदपत्रे पाहून अनेकांचे अवसान गळून पडते. त्यातच कर्ज मिळाले तर तुम्ही दर महिन्याला इमाने इतबारे कर्जाचा हफ्ता भरता. काही कारणास्तव एखादा हफ्ता भरण्यात अडचण आली तर बँका तुम्हाला सळो की पळो करुन सोडतात. मात्र, याच राष्ट्रीय बँकांनी गेल्या ५ वर्षात कोट्यवधींचे कर्ज माफ केले आहे. विशेष म्हणजे, तशी अधिकृत माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत देशातील बँकांनी राईट ऑफ केलेल्या रकमेबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. संसदेत गेल्या ५ वर्षांची आकडेवारी सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात बँकांनी गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये शेड्युल्ड व्यावसयिक तथा व्यापारी बँकांनी १० लाख ९ हजार ५११ कोटी रुपयांची बुडीत कर्जे निर्लेखित केली आहेत’, अशी माहितीही त्यांनी दिली.

बुडीत कर्जे निर्लेखित अर्थात ‘राइट ऑफ’ म्हणजे काय ? तर कर्जदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही जाणीवपूर्वक कर्ज चुकवत नाही त्यांना विलफुल डिफॉल्टर म्हटले जाते. विलफुल डिफॉल्टरकडून कर्जाच्या परतफेडीची शक्यता पूर्णत: मावळते तेव्हा बँक या लोकांनी घेतलेले कर्ज थकले, असे मानून ते बुडाले समजून बुडीत खात्यात टाकून म्हणजेच निर्लेखित करून टाकते. पण निर्लेखित करणे म्हणजे कर्जमाफी असा अर्थ होत नाही. ताळेबंद नीट दिसावा यासाठी बँका कर्ज निर्लेखित करतात. याचीही एक प्रक्रिया आहे.रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँका आधी कर्जाला नॉन परफॉर्मिंग असेट घोषित करतात. जेव्हा त्याची वसुली होत नाही तेव्हा निर्लेखित केले जाते.

संसदेत गेल्या पाच वर्षांची आकडेवारी सादर करताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून बँकांमध्ये अडकलेली कर्जे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राइट-ऑफ खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहेत. तसेच सर्व बँका आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे तथा आपापल्या संचालक मंडळाच्या मंजुरीच्या धोरणानुसार भांडवल अनुकूल पातळीवर आणण्यासाठी आपला हिशेब जुळवतात. याअंतर्गत बँका लाभ मिळवण्यासाठी व भांडवलाची अनुकूल पातळी गाठण्यासाठी नियमितपणे एनपीए बुडीत खात्यात टाकतात.

राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन बोलत होत्या. ‘करलाभ मिळविण्यासाठी व भांडवलवृद्धी साधण्यासाठी बँका नेहमी अशी बुडीत कर्जे ताळेबंदातून निर्लेखित करत असतात. रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे आणि संबंधित बँकांच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणांनुसार ही प्रक्रिया होते. त्यामध्ये चार वर्षे पूर्ण झाल्यावर पूर्ण तरतूद करण्यात आलेल्या बुडीत कर्जांचा समावेश असतो.

बँकेचे थकीत वसुली कर्ज बुडीत खात्यात टाकल्याने कर्जदाराला फायदा होत नाही. थकीत वसुली प्रक्रिया सुरूच राहते. बँका याअंतर्गत न्यायालये किंवा कर्ज वसुली न्यायाधिकरणांची मदत घेतात. तसेच मागील ५ वर्षांत सरकारी बँकेने माफ केलेल्या कर्जांपैकी १,o३ लाख कोटी वसूल केले आहेत. तसेच, गेल्या ५ वर्षात शेड्युल्ड कमर्शियल बँकांनी १०.०९ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. कर्जे निर्लेखित केली तरीही कर्जदाराला त्याचा फायदा होत नाही. कर्जाची परतफेड करणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरूच राहते. उपलब्ध विविध उपायांद्वारे निर्लेखित केलेली रक्कम वसूल करण्यासाठी बँका कारवाई करत असतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधिमंडळ अधिवेशनात विद्यार्थीही गिरवताय धडे… यंदाचे आहे ४९वे वर्ष… असा आहे त्याचा आजवरचा इतिहास

Next Post

उद्योग निरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर…राजकीय चर्चेला सुरुवात

सप्टेंबर 10, 2025
Untitled 7
महत्त्वाच्या बातम्या

समृध्दी महामार्गावर रस्त्यावर खिळे, गाड्या पंक्चरमुळे गाड्यांची रीघ

सप्टेंबर 10, 2025
Screenshot 20250910 114142 Collage Maker GridArt
संमिश्र वार्ता

मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा…तीन शिक्षण अधिका-यांना अटक

सप्टेंबर 10, 2025
modi 111
संमिश्र वार्ता

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पोस्टला दिले हे उत्तर…

सप्टेंबर 10, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला केली अटक

सप्टेंबर 10, 2025
T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Next Post
mpsc

उद्योग निरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011