इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुमारे चाळीस वर्षांपूर्वी शालेय अभ्यासक्रमात ‘बाबल्या चितेतून पळाला, ‘ अशी एक कथा होती. काही चित्रपटात देखील एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यावर तो दुसरीकडे जिवंत असल्याचे दिसते. परंतु प्रत्यक्षात असे घडले, तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र उत्तर प्रदेशात खरोखर अशी घटना घडली. आणि घटनेमुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली, नेमकी काय आहे ही घटना?
मदिहान हद्दीतील भवानीपूर गावात उघडकीस असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यापूर्वी झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र अंत्यसंस्कार केल्यानंतर कुटुंबीय रात्री घरी पोहोचले तेव्हा ती व्यक्ती जिवंत असल्याचे आढळून आले. तपासानंतर पोलिसांनी मृताच्या खऱ्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे.
यासंदर्भात पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कोन भरुहवा गाव भाजी मंडईजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू झाला होता. पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यात व्यस्त होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला मृताचा फोटो पाहून भवानीपूर गावातील एका रहिवासी कुटुंबातील सदस्य पोलिसांसह पोस्टमॉर्टम हाउसमध्ये पोहोचले आणि त्यांनी या मृताची ओळख मुनीलाल (42) म्हणून केली. यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
रात्री अंत्यसंस्कार आटोपून कुटुंबीय घरी परतले, तर नागरिकांना मुन्नीलाल गर्दीच्या मधोमध बोलत असल्याचे पाहून धक्काच बसला. मुन्नीलाल जिवंत सापडल्याने कुटुंब, नातेवाईक व ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कोणाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले याची चिंता नागरिकांना वाटू लागली. मुनीलालच्या भावांनी सांगितले की, मृताच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. चेहरा पूर्ण सुजला होता. चेहरा आणि दिसायला हुबेहूब मुन्नीलाल सारखाच होता. त्यामुळे त्याला आपला भाऊ मानून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तर दुसरीकडे मुन्नीलालने सांगितले की, तो जवळपास महिनाभर घराबाहेर पडला होता. चुनार येथे नातेवाईकांसह राहत होते. त्याच्याकडे मोबाईल नव्हता. यामुळे तो घरच्यांना सांगू शकला नाही. मुनीलालला बोलावून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस चौकी प्रभारींनी सांगितले.
विशेष म्हणजे त्यानंतर आता गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीचीही ओळख पटली. पकोडी कोळराम जियावान (रा. चामेर बंधा, ता. चकरघट्टा जिल्हा चंदौली ) अशी त्याची ओळख आहे. मृताच्या पत्नीने नातेवाईक सोबत राजगड पोलिस चौकी गाठली आणि फोटोवरून त्याची ओळख पटवली. पकोरी कोळराम हे सकटेशगड येथील सासरवाडीच्या घरी जाण्यासाठी घरातून निघाले, तेव्हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. आता मृत तरुणाच्या खऱ्या कुटुंबीयांनी येऊन त्याची ओळख पटवली आहे. परंतु ज्यांनी त्याचे अंत्यसंस्कार केले त्यांची ओळख पटवण्यात चूक झाली. मात्र या घटनेची सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.
family members cremation last rites dead body person alive uttar pradesh mirzapur