सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष मुलाखत – ऑनलाइन ऑफलाइनच्या गोंधळात शिक्षकांप्रमाणेच पालकांची भूमिकाही महत्त्वाची: मुख्याध्यापिका नंदा पेटकर

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 4, 2022 | 1:38 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220203 WA0028

 

नाशिक – कोविडमुळे शिक्षण क्षेत्रात खूप बदल झाला. सध्याच्या ऑनलाइन ऑफलाइनच्या गोंधळात विद्यार्थ्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत, भीती, दडपण आहे. अशावेळी शिक्षकांप्रमाणेच पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. कारण सध्याच्या काळात विद्यार्थी घरी पालकांसोबत अधिक असतात अशावेळी पालकांनी विद्यार्थ्यांचे मित्र होऊन त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजे. त्यांच्या मनातली भीती काढून चांगल्या गोष्टींसाठी त्यांना प्रवृत्त करणं गरजेचं आहे, अस मत नाशिकच्या रंगुबाई जुन्नरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नंदा पेटकर यांनी व्यक्त केले.

शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांच्या क्षमतेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, आजचे विद्यार्थी हे प्रचंड हुशार आहेत. टेक्नोसॅव्ही असल्याने ऑनलाइन शाळेशी त्यांनी पटकन जुळवून घेतले. या काळात अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने व्हिडीओ बनवणे, पीपीटी तयार करणे, झूम क्लास या गोष्टी शिकल्या. आज विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रलोभने आहेत, बाहेर प्रचंड स्पर्धा आहे अशावेळी त्यांची क्षमता ओळखून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की सध्या बोर्डाने परीक्षेचा वेळ वाढवून दिला आहे. काही कारणाने परीक्षेला यायला जमले नाही तर काही काळाने परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. पण कोविडची ही परिस्थिती काही काळाने बदलेल. पुन्हा सगळं पूर्वपदावर येईल. आणि आता विद्यार्थ्यांची लिखाणाची, ऐकण्याची, सवय कमी झाली आहे. पूर्णवेळ घरी असल्याने अनेक विद्यार्थी एकलकोंडे झाले आहेत. मनातलं व्यक्त करत नाहीत. मध्यंतरी ऑफलाइन शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमधला हा बदल मोठ्या प्रमाणावर जाणवला. त्यांना बोलतं करण्याची मोठी जबाबदारी आमच्या शिक्षकांवर होती. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. तीन तास बसून लिखाणाची सवय गेली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन, श्रवण आणि संवाद या कौशल्यांवर भर देणे गरजेचे आहे. यासाठी पालक आणि शिक्षका दोघांनी प्रयत्न केले पाहिजे. सध्याच्या या बदललेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांचे समुपदेशनही आम्ही करतो, आणि ती सध्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

स्क्रीन टाइमविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ऑनलाइन शाळा आणि क्लासमुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. पालकांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. शाळेनंतर गेम, व्हिडीओ यासाठी मोबाईल देऊ नये. त्याऐवजी मुलांना वाचनाकडे वळवावे. त्यांच्यासोबत बसून गप्पा मारणं, चर्चा करण, वाचन करणं आवश्यक आहे. आपली मुलं फोनवर नक्की काय करतात, कोणाशी बोलतात यावर लक्ष ठेवले पाहिजे. याविषयी पालक आणि शिक्षकांमध्ये सुसंवाद होणंही गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या मनातली परीक्षेविषयीची भीती काढताना त्यांनी सांगितले की, घाबरू नका, प्रामाणिक प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा, आहे त्या परिस्थितीतवर मात करून पुढे जायचं आहे. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यामुळे जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास ही गुरुकिल्ली लक्षात ठेवा आणि पुढे जा. समस्या अनेक येतील पण प्रत्येक समस्या ही मार्ग घेऊनच येते, तो मार्ग सापडला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑफलाइन परीक्षाच उत्तम आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले.
ही सर्व मुलाखत फेसबुकच्या या लिंकावर बघा
https://fb.watch/aYBSHVr9ax

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जेफ बेझोसच्या सुपर बोटीसाठी तोडणार ऐतिहासिक पूल; बोटीची किंमत ऐकून व्हाल थक्क

Next Post

परमवीरसिंग यांची वक्तव्ये राजकारणाने प्रेरीत ; नवाब मलिक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
Next Post
nabab malik

परमवीरसिंग यांची वक्तव्ये राजकारणाने प्रेरीत ; नवाब मलिक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011