गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन पाच पटीने तर आणि निर्यात सहा पटींने वाढली…

एप्रिल 27, 2025 | 7:32 am
in राष्ट्रीय
0
image0015OXC


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांच्या उत्पादन योजनेसाठी (ईसीएमएस) मार्गदर्शक तत्त्वे आणि पोर्टल जारी केले. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी सरकारच्या स्पष्ट धोरणाची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले की, भारताने आकारमान आणि मूलभूत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तयार उत्पादनांची निर्मिती करून आपला प्रवास सुरू केला, ज्यामुळे टप्याटप्याने एकीकरण शक्य झाले. त्यानंतर मॉड्यूल-स्तरीय उत्पादन, नंतर सुट्या भागांचे उत्पादन आणि आता सुटे भाग तयार करणाऱ्या सामग्रीचे उत्पादन सुरु झाले. मूल्य साखळीत तयार मालाचा वाटा 80 ते 85 टक्के आहे असे अधोरेखित करून त्यांनी नमूद केले की इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात साध्य केलेले प्रमाण अभूतपूर्व आहे.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात पाच पटीने वाढ झाली आहे आणि निर्यात सहा पटींहून अधिक वाढली आहे, निर्यात सीएजीआर 20% पेक्षा जास्त आणि उत्पादन सीएजीआर 17% पेक्षा जास्त असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मोबाईल फोन, सर्व्हर, लॅपटॉप आणि आयटी हार्डवेअरमध्ये झपाट्याने प्रगती झाली आहे आणि हा उद्योग मोठी भरारी घेण्यास सज्ज आहे. वैष्णव यांनी ईसीएमएसचे वर्णन एक समतल योजना असे केले जी केवळ इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे तर औद्योगिक, वीज, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि इतर क्षेत्रांनाही सहाय्य करेल. देशभरात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी एक संपूर्ण परिसंस्था अस्तित्वात येत आहे यावर त्यांनी भर दिला.

नवोन्मेष आणि गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करत, केंद्रीय मंत्री म्हणाले की अनेक कंपन्यांनी आता डिझाइन टीम्स स्थापन केल्या आहेत आणि प्रत्येक सहभागीने अशा टीम्स विकसित करणे आवश्यक आहे. दर्जावर भर देत, त्यांनी या क्षेत्रातील सिक्स सिग्मा मानके साध्य करण्याचे आवाहन केले आणि गुणवत्ता मापदंडाचे पालन न करणाऱ्यांच्या सेवा रोखल्या जातील. डिझाइन क्षमता आणि दर्जा उत्कृष्टता यावर दुहेरी लक्ष केंद्रित केल्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये भारताच्या नेतृत्वाला चालना मिळेल असे ते म्हणाले.

वैष्णव यांनी एआय आणि डेटा-आधारित उपायांमधील भारताच्या प्रगतीचाही उल्लेख केला. एआय कोशवर 350 डेटासेट आधीच अपलोड केले गेले आहेत आणि आयआयटीने विकसित केलेली चार एआय टूल्स लवकरच जारी केली जातील अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्था मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान -कायदेशीर उपाय विकसित केले जात आहेत.

ईसीएमएसकडे मंजुरीसाठी तयार प्रकल्प मोठ्या संख्येने आहेत आणि जागतिक इलेक्ट्रॉनिक्स केंद्र म्हणून भारताच्या जलद वाढीची ही केवळ सुरुवात आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमादरम्यान, भारतातील पहिले स्वदेशी एआय आधारभूत मॉडेल तयार करण्यासाठी सर्वम एआयची निवड करण्यात आली. देशाच्या एआय नवोन्मेष परिसंस्थेतील हा एक प्रमुख टप्पा आहे.

मजबूत उद्योग, सरकार आणि जागतिक सहभाग
उद्घाटन समारंभाला 200 पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, दूतावासाचे प्रतिनिधी, देशातील आणि जागतिक उच्चपदस्थ नेते, देशांतर्गत आणि जागतिक उद्योग संघटना, वित्तीय संस्था, सल्लागार कंपन्या, प्रसारमाध्यमे यांचा समावेश होता.

ईसीएमएससाठीची मार्गदर्शक तत्त्वे आणि पोर्टलचे अनावरण हा एक महत्वाचा टप्पा होता, ज्याने उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते, प्रतिष्ठित उद्योग संघटना, अग्रगण्य वित्तीय संस्था आणि विविध दूतावासांच्या प्रतिनिधींचे लक्ष वेधले. या ऐतिहासिक घटनेने प्रमुख भागधारकांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा मान्यवरांच्या उपस्थितीने देशात घटक उत्पादनाला पुढे नेण्याची वचनबद्धता, आणि व्यापक स्वारस्य अधोरेखित केले. या कार्यक्रमादरम्यान उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केलेल्या उत्पादन-आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनांच्या अखंड अंमलबजावणीची प्रशंसा केली. सुव्यवस्थित प्रक्रियेमुळे प्रोत्साहनांचे त्वरित वितरण कसे सुलभ झाले आहे, यावर भर देत या उपक्रमांच्या कार्यक्षम अंमलबजावणीबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह सर्व उपस्थितांनी पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ, एक मिनिटाचे मौन पाळले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या चित्रपटाची कान चित्रपट महोत्सवात या विभागात निवड…हे आहे कथानक

Next Post

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
YASHADA NEWS 2

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011