बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन पाच पटीने तर आणि निर्यात सहा पटींने वाढली…

by Gautam Sancheti
एप्रिल 27, 2025 | 7:32 am
in राष्ट्रीय
0
image0015OXC


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांच्या उत्पादन योजनेसाठी (ईसीएमएस) मार्गदर्शक तत्त्वे आणि पोर्टल जारी केले. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी सरकारच्या स्पष्ट धोरणाची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले की, भारताने आकारमान आणि मूलभूत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तयार उत्पादनांची निर्मिती करून आपला प्रवास सुरू केला, ज्यामुळे टप्याटप्याने एकीकरण शक्य झाले. त्यानंतर मॉड्यूल-स्तरीय उत्पादन, नंतर सुट्या भागांचे उत्पादन आणि आता सुटे भाग तयार करणाऱ्या सामग्रीचे उत्पादन सुरु झाले. मूल्य साखळीत तयार मालाचा वाटा 80 ते 85 टक्के आहे असे अधोरेखित करून त्यांनी नमूद केले की इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात साध्य केलेले प्रमाण अभूतपूर्व आहे.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात पाच पटीने वाढ झाली आहे आणि निर्यात सहा पटींहून अधिक वाढली आहे, निर्यात सीएजीआर 20% पेक्षा जास्त आणि उत्पादन सीएजीआर 17% पेक्षा जास्त असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मोबाईल फोन, सर्व्हर, लॅपटॉप आणि आयटी हार्डवेअरमध्ये झपाट्याने प्रगती झाली आहे आणि हा उद्योग मोठी भरारी घेण्यास सज्ज आहे. वैष्णव यांनी ईसीएमएसचे वर्णन एक समतल योजना असे केले जी केवळ इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे तर औद्योगिक, वीज, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि इतर क्षेत्रांनाही सहाय्य करेल. देशभरात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी एक संपूर्ण परिसंस्था अस्तित्वात येत आहे यावर त्यांनी भर दिला.

नवोन्मेष आणि गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करत, केंद्रीय मंत्री म्हणाले की अनेक कंपन्यांनी आता डिझाइन टीम्स स्थापन केल्या आहेत आणि प्रत्येक सहभागीने अशा टीम्स विकसित करणे आवश्यक आहे. दर्जावर भर देत, त्यांनी या क्षेत्रातील सिक्स सिग्मा मानके साध्य करण्याचे आवाहन केले आणि गुणवत्ता मापदंडाचे पालन न करणाऱ्यांच्या सेवा रोखल्या जातील. डिझाइन क्षमता आणि दर्जा उत्कृष्टता यावर दुहेरी लक्ष केंद्रित केल्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये भारताच्या नेतृत्वाला चालना मिळेल असे ते म्हणाले.

वैष्णव यांनी एआय आणि डेटा-आधारित उपायांमधील भारताच्या प्रगतीचाही उल्लेख केला. एआय कोशवर 350 डेटासेट आधीच अपलोड केले गेले आहेत आणि आयआयटीने विकसित केलेली चार एआय टूल्स लवकरच जारी केली जातील अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्था मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान -कायदेशीर उपाय विकसित केले जात आहेत.

ईसीएमएसकडे मंजुरीसाठी तयार प्रकल्प मोठ्या संख्येने आहेत आणि जागतिक इलेक्ट्रॉनिक्स केंद्र म्हणून भारताच्या जलद वाढीची ही केवळ सुरुवात आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमादरम्यान, भारतातील पहिले स्वदेशी एआय आधारभूत मॉडेल तयार करण्यासाठी सर्वम एआयची निवड करण्यात आली. देशाच्या एआय नवोन्मेष परिसंस्थेतील हा एक प्रमुख टप्पा आहे.

मजबूत उद्योग, सरकार आणि जागतिक सहभाग
उद्घाटन समारंभाला 200 पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, दूतावासाचे प्रतिनिधी, देशातील आणि जागतिक उच्चपदस्थ नेते, देशांतर्गत आणि जागतिक उद्योग संघटना, वित्तीय संस्था, सल्लागार कंपन्या, प्रसारमाध्यमे यांचा समावेश होता.

ईसीएमएससाठीची मार्गदर्शक तत्त्वे आणि पोर्टलचे अनावरण हा एक महत्वाचा टप्पा होता, ज्याने उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते, प्रतिष्ठित उद्योग संघटना, अग्रगण्य वित्तीय संस्था आणि विविध दूतावासांच्या प्रतिनिधींचे लक्ष वेधले. या ऐतिहासिक घटनेने प्रमुख भागधारकांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा मान्यवरांच्या उपस्थितीने देशात घटक उत्पादनाला पुढे नेण्याची वचनबद्धता, आणि व्यापक स्वारस्य अधोरेखित केले. या कार्यक्रमादरम्यान उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केलेल्या उत्पादन-आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनांच्या अखंड अंमलबजावणीची प्रशंसा केली. सुव्यवस्थित प्रक्रियेमुळे प्रोत्साहनांचे त्वरित वितरण कसे सुलभ झाले आहे, यावर भर देत या उपक्रमांच्या कार्यक्षम अंमलबजावणीबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह सर्व उपस्थितांनी पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ, एक मिनिटाचे मौन पाळले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या चित्रपटाची कान चित्रपट महोत्सवात या विभागात निवड…हे आहे कथानक

Next Post

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
YASHADA NEWS 2

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011