शुक्रवार, सप्टेंबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चक्क निवडणूक आयोगच हतबल! सर्वोच्च न्यायालयात केला हा धक्कादायक खुलासा

by Gautam Sancheti
एप्रिल 11, 2022 | 5:06 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
election

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – निवडणूक काळात मोफत वस्तू वाटणे हा जणू प्रघातच पडला आहे. सत्तेत आल्यास मोफत भेट वस्तू देण्याच्या आश्वासनांना पूर्ती करण्यापासून राजकीय पक्षांना रोखता येत नाही, अशी मोठी हतबलता केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्रच सादर केले आहे. निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेल्या आयोगानेच अशी हतबलता व्यक्त केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यास आयोगाने प्रतिसाद देताना हे मत व्यक्त केले आहे. अनेक अशक्यप्राय आमिषे दाखविणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची मागणी उपाध्याय यांनी या याचिकेद्वारे केली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, निवडणूक आयोग राज्याची धोरणे आणि निर्णयांचे नियमन करू शकत नाही, विजयी पक्षाच्या वतीने सरकार स्थापन करण्यासाठी काही निर्णय घेतले जाऊ शकतात. मोफत भेटवस्तू देणे हा राजकीय पक्षांचा धोरणात्मक निर्णय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. न्यायालय पक्षकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकते. मात्र निवडणूक आयोग त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. अशी धोरणे आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत, त्यामुळे याचा राज्याच्या आर्थिक गोष्टींवर विपरित परिणाम करतात, हा राज्याच्या मतदारांना ठरविण्याचा प्रश्न आहे, असे आयोगाने नमूद केले आहे.

जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावून या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर मागितले होते. राजकीय पक्षांनी मतदारांना मोफत भेटवस्तू देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.
दरम्यान, हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगून न्यायालयाने म्हटले होते की, याचा राज्याच्या नियमित बजेटवर परिणाम होतो. त्यामुळे मोफत वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करून निवडणूक चिन्हे जप्त करावीत.
तसेच निवडणूक आयोगाचे नियम असतानाही नागरिकांच्या पैशाचा गैरवापर होत आहे. त्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीची पाळेमुळे हादरली आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील अचूकता बिघडते. मोफत भेटवस्तू देण्याची प्रवृत्ती लोकशाही मूल्यांच्या अस्तित्वालाच सर्वात मोठा धोका नाही तर संविधानाच्या भावनेलाही धक्का पोहोचवणारी आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पेट्रोल डिझेलची टाकी फूल भरणे धोकादायक आहे का? इंडियन ऑइलने दिले हे स्पष्टीकरण

Next Post

आलिया भट्ट नाहीय भारताची नागरिक! तिच्याकडे आहे या देशाचा पासपोर्ट; लग्नानंतर काय करणार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
महत्त्वाच्या बातम्या

सीबीआयने अनिल अंबानीशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये केले आरोपपत्र दाखल…२७९६ कोटींच्या घोटाळयाचा असा रचला कट

सप्टेंबर 19, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी साधला संवाद…या विषयावर झाली चर्चा

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250918 WA0276 e1758249257199
स्थानिक बातम्या

नाशिक एफडीएची धडक कारवाई…४३ हजाराचा बनावट पनीर व खव्याचा साठा जप्त

सप्टेंबर 19, 2025
cricket
स्थानिक बातम्या

रणजी ट्रॉफी सराव.. नाशिकच्या सत्यजित बच्छावची या सामन्यात ५ बळींसह अष्टपैलु चमक

सप्टेंबर 19, 2025
Untitled 26
मुख्य बातमी

भारतातील या ७ नैसर्गिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश…महाराष्ट्रातील या स्थळालाही स्थान

सप्टेंबर 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, शुक्रवार, १९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
IMG 20250918 WA0380 1
संमिश्र वार्ता

हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्यात सुधारणा करा…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 18, 2025
G1IZjsTaQAA9THD 1024x652 1
महत्त्वाच्या बातम्या

सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश….

सप्टेंबर 18, 2025
Next Post
alia bhat

आलिया भट्ट नाहीय भारताची नागरिक! तिच्याकडे आहे या देशाचा पासपोर्ट; लग्नानंतर काय करणार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011