शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री होणार? रामदास आठवले यांचे सूचक वक्तव्य….

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 26, 2024 | 2:02 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
cm eknath shinde 1 e1704958478974


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाईल याची चर्चा आता रंगली आहे. दरम्यान शिंदे यांना केंद्रीय मंत्रीपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्याबाबत सूचक विधान केले आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे असेही आठवले यांनी सांगितले. त्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.

आज सकाळीज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यापालांना सुपूर्द केला. यावेळी राज्यपालांनी शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघण्याच्या सूचना केली. राज्याच्या विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबर पर्यंत होती. ती आता संपल्याने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थितीत होते.

पण, या राजीनाम्यानंतर आठवले यांचे वक्तव्य आले आहे. या वक्तव्यात तथ्य सुध्दा आहे. मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री करणे महायुतीला परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिले तर त्यांना देशाच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण करता येईल. त्यामुळे या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

यामुळे भाजपचा निर्णय
महायुतीला २३० जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यासाठी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लेखक, दिग्दर्शक, अभिनेते ‘नागराज मंजुळे’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव….

Next Post

विधानसभा निवडणुकीत प्रचार केला नाही म्हणून तरुणावर चाकुचे वार करत बेदम मारहाण…गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

विधानसभा निवडणुकीत प्रचार केला नाही म्हणून तरुणावर चाकुचे वार करत बेदम मारहाण…गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011