इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
EPIC ला आधारशी जोडण्यासाठी निवडणूक आयोग कलम ३२६, आरपी कायदा, १९५० आणि संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनुसार कारवाई करणार आहे. यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तज्ञांमध्ये लवकरच तांत्रिक सल्लामसलत सुरू होणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे केंद्रीय गृह सचिव, सचिव विधिमंडळ विभाग, सचिव मंत्रालय आणि सीईओ, यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेतली.
भारतीय संविधानाच्या कलम ३२६ नुसार, मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकालाच दिला जाऊ शकतो; आधार कार्ड केवळ व्यक्तीची ओळख स्थापित करते. म्हणून, असा निर्णय घेण्यात आला की EPIC ला आधारशी जोडणे हे संविधानाच्या कलम ३२६, लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम २३(४), २३(५) आणि २३(६) मधील तरतुदींनुसार आणि WP(सिव्हिल) क्रमांक १७७/२०२३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगानेच केले जाईल.
त्यानुसार, UIDAI आणि ECI च्या तांत्रिक तज्ञांमध्ये लवकरच तांत्रिक सल्लामसलत सुरू होणार आहे.