नाशिक – सध्या नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडून काढले असून जोरदार पावसाने ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माब होऊन शेतकऱ्यांचा शेतीचे, शेतमालाचे, नागरिकांचे, दुकानदार व्यापाऱ्यांचे तसेच पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .अनेक ठिकाणी पाझर तलाव क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक ठिकाणी छोटे छोटे पाण्याचे बंधारे, पाझर तलाव फुटून त्या परिसराचे नुकसान झाले. आधीच कोरोना संकटातून जनता सावरत नाही तोच अस्मानी संकटाने पुन्हा एकदा तडाखा देत संपूर्ण जनजीवन विस्कळीत करत मोठे नुकसान केले आहे .बहुतांशी भाग हा पाण्याखाली गेल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे ह्या सर्वांचीच पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व बालकल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी निफाड येवला मतदार संघातील बाधित गावांना जाऊन पाहणी केली. लासलगाव परिसरातील गावांना भेट देत तेथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली नंतर लासलगाव येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील पाहणी केली .या प्रसंगी ना.डॉ.भारती पवार यांनी नुकसानीचे पंचनामे करण्यात अधिकाऱ्यांनी दिरंगाई न करता सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई नुकसानग्रस्तांना मिळावी यासाठी अधिकारी वर्गास सूचना केल्या. या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे, वाहून गेली आहे गाढवे नाल्याला पूर येऊन प्रतापसागर तलाव फुटल्याने तेथील आदिवासींच्या घरांचे मोठ्याब प्रमाणात नुकसान झाल्याने ते उघड्यावर आले बाधित नागरिकांना तातडीची मदत द्या त्यांना शासनाच्या आपत्कालीन निधीतून तात्पुरत्या राहण्याची व जेवणाची सोय करण्याची सूचना केली या प्रसंगी निफाड भाजप तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते ,जिल्हा परिषद सदस्य व लासलगाव भाजपा मंडल अध्यक्ष डी के नाना जगताप भाजप महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णताई जगताप, ओ बी सी भाजपा प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार घोरपडे साहेब, आरोग्य अधिकारी डॉ. राठोड,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे, राजेंद्र चाफेकर ,पंढरीनाथ पीठे यांचेसह असंख्य शेतकरी ,नागरिक ,व्यापारी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.