मुंबई – दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण प्रकाशाचा उत्सव आनंद आणि चैतन्याचे पर्व होय. त्यामुळे भारतासह जगभरात दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. या दिव्यांच्या सणाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात. या सणाच्या खूप आधीपासून गृहीणी घराची साफसफाई आणि दिवाळीची खरेदी यासह सर्व तयारी सुरू करतात. या दिवशी सर्व जण घरातील सुखासाठी देवी माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात. पण आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे दिवाळी साजरी होत नाही. जाणून घेऊ या त्या ठिकाणांबद्दल…
भारतातील या ठिकाणी देवी माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करत नाहीत किंवा फटाकेही फोडत नाहीत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येथे नागरिक दिवे देखील लावत नाहीत. भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्यात दिवाळी हा सण साजरा केला जात नाही. केरळचे नागरिक दिवाळी सोडून सर्व सण उत्साहात साजरे करतात, पण दिवाळीत काहीच करत नाहीत. केरळमध्ये दिवाळी फक्त कोचीमध्येच साजरी केली जाते.
दिवाळी का साजरी केली जात नाही?
केरळमध्ये दिवाळी का साजरी केली जात नाही, असा प्रश्न आता सर्वांच्या मनात निर्माण होत असेल. परंतु केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्याची अनेक कारणे आहेत. केरळमध्ये महाबली हा राक्षस राज्य करत होता आणि त्याची येथे पूजा केली जाते. त्यामुळे राक्षसाच्या पराभवावर नागरिक येथे पूजा करत नाहीत. प्रभू श्रीराम हे रावणावर विजय मिळवून वनवास संपवून अयोध्येला परतले हे आपणा सर्वांना माहीत आहे. यामुळे भारतात कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला दिवाळीचा सण साजरा केला जातो.
दुसरे कारण?
केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्याचे दुसरे कारण म्हणजे तेथे हिंदू धर्माचे नागरिक कमी आहेत. त्यामुळे राज्यात दिवाळी साजरी होत नाही. यावेळी केरळमध्ये पाऊस पडतो, त्यामुळे फटाके आणि दिवेही पेटत नाहीत. तसेच केरळबरोबरच तामिळनाडूमध्येही काही ठिकाणी दिवाळी साजरी होत नाही. मात्र तेथे नरक चतुर्दशी साजरी करताना दिसतात.