मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सरकारवर आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; दीपिका चव्हाण यांची चित्रा वाघवर टीका

by Gautam Sancheti
मार्च 15, 2022 | 8:07 pm
in स्थानिक बातम्या
0
dipika chavhan

 

सटाणा : देशातील भाजपशासित राज्यात महिलांवर बेसुमार अत्याचार सुरू आहेत. फडणवीसांच्या काळात गँगरेप व खुनाच्या ४७ घटना घडल्याने महिला अत्याचारात २०१९ मध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण राबवून त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजपशासित राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत असताना चित्रा वाघ यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची खरमरीत टिका राज्य महिला आयोगाच्या सदस्या व बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल पत्रकार परिषदेत महिला अत्याचारासंदर्भात महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या सौ.चव्हाण यांनी आज उत्तर दिले. यावेळी बोलताना सौ.चव्हाण म्हणाल्या, ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, त्या राज्यात महिलांना सन्मान मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उत्तरप्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, हरयाणा व कर्नाटक या भाजपशासित राज्यात गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनेच्या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न योगी सरकारने केला. २०१६ मधील कोपर्डीच्या घटनेनंतर तत्कालीन फडणवीस सरकारला धारेवर धरणार्‍या सुप्रियाताईंमुळेच आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली. फडणवीस सरकारच्या काळात २०१५ साली ३१,२१६ घटना, २०१६ साली ३१,३८८, २०१७ साली ३१,९७८, २०१८ साली ३५,४९७ तर २०१९ साली ३७,१४४ महिलांवर अत्याचार झाले. फडणवीस सरकार हे महिलांसाठी कर्दनकाळ ठरले होते. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर २०२० पासून महिला अत्याचार, सामूहिक बलात्कार व खुनाच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.

महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे चित्राताई आपण मोठ्या झाल्या. पक्षाने आपल्याला महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद देऊन सन्मान दिला. हे आपण विसरल्या आहात. फडणवीस सरकारने पती किशोर वाघ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्यामुळे ती कारवाई होऊ नये यासाठी ज्या बापाने आपल्याला मोठं केलं, त्याच बापाला विसरून आपण पक्षच बदलला. नाइलाजाने पक्षांतर करताना आपल्याला रडताना संपूर्ण देशाने पाहिले आहे. आणि त्यानंतर भाजपात स्वत:चे महत्व वाढावे म्हणून महाविकास आघाडी सरकारसह आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने बिनबुडाचे आरोप करणे, हे योग्य नाही. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच महाविकास आघाडी सरकारबाबत वारंवार अशोभनीय वक्तव्य करण्याचा दुटप्पीपणा आपल्याला कसा जमत असेल?, असा प्रश्नही टिका करताना सौ.चव्हाण यांनी उपस्थित केला.
चांगली कामे खुपत आहेत
महाविकास आघाडी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र महिला व नवजात शिशू रुग्णालये उभारण्याची घोषणा करून महिलांना आरोग्यविषयक सुविधा उभारण्यासाठी पाऊल उचललं आहे. महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण राबविले जात आहे. मात्र कारवाई टाळणे आणि सत्तेच्या लालसापोटी ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली, तो पक्ष सोडणार्‍या लाचखोरांच्या डोळ्यात ही चांगली कामे खुपत आहेत.
– दीपिका चव्हाण

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! एकाच मोजणी रजिस्टर नंबरचे आढळले दोन दस्तऐवज; राज्य सरकारने घेतला हा निर्णय

Next Post

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
carona 11

नाशिक - जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011