दिंडोरी – तालुक्यातील परमोरी या गावच्या गावक-यांनी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या आपल्या गावच्या सैनिकाचे अनोख्या पद्धतीने स्वागत व सत्कार केला. परमोरीचे रहिवाशी असलेले प्रकाश असो खारक हे ३१ जानेवारी रोजी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले. ते सैन्यदलामध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होते. त्यांच्याबद्दल आपला आदर दर्शविण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात सरपंच गंगाधर निखाडे सह मान्यवरांनी स्वागतपर भाषण केले. या स्वागत सोहळ्यापूर्वी संपूर्ण गावातून गाड्यांच्या ताफ्यात त्यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. आपले हे भव्य स्वागत पाहून प्रकाश खारख भारावून गेले. हा कार्यक्रमाचे संयोजन ज्ञानेश्वर तिडके ,कृष्णा देशमुख ,सुनील निमसे ,श्रीकांत भुसाळ, सागर देशमुख आणि मित्रपरिवाराने केले.