बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रासायनिक खत दरवाढी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

by India Darpan
मे 18, 2021 | 3:08 pm
in स्थानिक बातम्या
0
swabhimani

दिंडोरी – केंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असून २० मे रोजी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. या संदर्भात पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांना १९ मे पासून लाखो शेतकरी दरवाढ मागे घ्या अशा आशयाचे पत्रही लिहतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी झालेले होते.
केंद्र सरकारने नुकतीच रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. नव्या दरामुळे शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडणार आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन मुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. त्यातच शेतीमालाचे खूप मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने महिन्यापासून लॉकडाऊन लावले आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यास बंदी घातलेली आहे. मार्केट कमिट्या बंद ठेवल्या आहेत. याचा सगळ्यात मोठा फटका शेतकर्‍यांना बसलेला आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा अर्थकारण पूर्णपणे कोलमोडणार आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत ५० ते ६० टक्के दरवाढ झालेली आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या संकट छायेतही शेतकर्‍यांनी कंबर कसलेली असताना देखील ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाले आहे. डीएपीच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे. २०१९ मध्ये रासायनिक खतांच्या किंमतीत ५० टक्के दरवाढ झालेली होती. आता ५० ते ६० टक्के दरवाढ केली. याच्या निषधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे. २० मे रोजी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. बांधावरून तसेच सामाजिक अंतर पाळून हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच लाखो शेतकरी १९ मे पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दरवाढ त्वरीत मागे घ्या, अशी  मागणी करतील, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कळवणमध्ये ३२ तर सुरगाण्यात ३३ मोबाईल टॉवर नेटवर्क जोडण्यास  प्रारंभ

Next Post

अखेर सोनाली कुलकर्णीचं शुभमंगल; असा झाला सोहळा

India Darpan

Next Post
2 1

अखेर सोनाली कुलकर्णीचं शुभमंगल; असा झाला सोहळा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011