दिंडोरी : ननाशी वीज उपकेंद्र कार्यक्षेत्रातील वणी खुर्द ,चारोसे ,पिंपळगावधूम ,साद्राळे ,आदी गावांचा वीजबिल न भरल्याने खंडित केलेला वीजपुरवठा शिवसेनेच्या आंदोलनामुळे पूर्ववत करण्यात आला आहे. महावितरणच्या ननाशी वीज उपकेंद्रअंतर्गत येणाऱ्या वरील गावांमधील तब्बल २२ ट्रान्सफार्मर चा वीज पुरवठा बिल न भरल्याने खंडित करण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या .त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी आपली कैफियत शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील ,माजी आमदार धनराज महाले यांना सांगितल्यावर त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशाने तातडीने शिवसैनिकांसह ननाशी वीज उपकेंद्रात मोर्चा काढून अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा जेली. त्यातुन चालू बिल भरून उर्वरित बिल दिवाळीनंतर काही महिन्यात भरले जाईल असा तोडगा काढण्यात आला .शिवसेनेच्या ह्या आंदोलनामुळे केवळ अर्ध्या तासात २२ ट्रान्सफार्मर सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, मा. आ.धनराज महाले, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, माजी उपसभापती उत्तम जाधव,ऍड.विलास निरगुडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नदीम सय्यद, उपतालुका प्रमुख विजय पिंगळ, संजय ढगे,दौलत ढगे ,गोटीराम ढगे ,राहुल ढगे ,धनंजय टिळे , ज्ञानेश्वर ढगे, गुलाब ढगे ,साहेबराव ढगे, पुंजा पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.