गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आज पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये बैठक…हॅाटलाईनवर होणार चर्चा

by Gautam Sancheti
मे 12, 2025 | 9:49 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 23

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आज पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये दुपारी १२ वाजता चर्चा होणार आहे. भारताकडून लेप्टिनेंट जनरल राजीव घई तर पाकिस्तानकडून मेजर जनरल काशिफ चौधरी बोलणार आहे. युध्द विरामला मजबूत करण्यासाठी असलेल्या शर्तीचे पालन व स्थीर व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. त्यानंतर भारत आपली भविष्यातील रणनीती ठरणार आहे. दरम्यान, रविवारी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) गेल्या चार दिवसांतील संपूर्ण घटनेची आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना दिली. त्यानंतर ही बैठक होणार आहे.

या बैठकीबाबत संरक्षण तज्ज्ञ संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, ही बैठक खूप महत्त्वाची आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या समझोत्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, ते कसे चालू ठेवायचे आणि ते कायमचे कसे बनवायचे… जेणेकरून पाकिस्तान पुन्हा या समझोत्याचे उल्लंघन करणार नाही आणि पुन्हा कोणतेही प्रक्षोभक पाऊल उचलणार नाही याची खात्री होईल. या बैठकीत काय होते ते आता समोर येईलच.

भारत-पाकिस्तान यांच्यात आज होणाऱ्या डीजीएमओ स्तरावरील चर्चेबद्दल भाजप नेते दिलीप घोष यांनी सांगितले की,आपण सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे; जे काही पाऊल उचलण्याची आवश्यकता असेल ते सरकार उचलेल. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करू शकतात. जर सरकारला वाटत असेल की विशेष अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता आहे, तर ते नक्कीच करतील.

काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी सांगितले की, २२ एप्रिल ते १० मे २०२५ या काळात घडलेल्या घटनांवर विशेष संसदीय अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी अशी संपूर्ण विरोधी पक्षाची मागणी आहे. म्हणूनच, आम्हाला वाटते की हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याचे समर्थन करण्यासाठी काँग्रेसने ‘तिरंगा यात्रा’ काढली आहे. काँग्रेस नेहमीच राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि शत्रूंना योग्य उत्तर देण्यासाठी उभी राहते असेही ते म्हणाले.

असा घडला घटनाक्रम
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. भारताने ९ मे रोजी पाकिस्तानवर प्रत्युत्तर म्हणून हवाई हल्ला केला आणि १० मे रोजी जोरदार तोफगोळांचा माराही केला. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी संवाद साधला आणि पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. भारताने स्पष्टपणे सांगितले की ही चर्चा फक्त डीजीएमओंमध्येच होईल. त्यानंतर १० मे रोजी दुपारी पाकिस्तानी डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी बोलण्यासाठी वेळ मागितला. दुपारी साडेतीन वाजता भारत आणि पाकिस्तान डीजीएमओ यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत पाकिस्तानी डीजीएमओकडून शस्त्रसंधीची मागणी झाली. भारताचा उद्देश पूर्ण झाला असल्याने भारताने ती मान्य केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करून भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीची माहिती दिली. या ट्विटनंतर लगेचच परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन देशाला शस्त्रबंदीची माहिती दिली. त्यानंतर आता ही बैठक होत आहे..

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद…हे आहे कारण

Next Post

या तारखेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता…जाणून घ्या, हवामानतज्ञांचा अंदाज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
rain1

या तारखेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता…जाणून घ्या, हवामानतज्ञांचा अंदाज

ताज्या बातम्या

amit shah 1

भ्रष्टाचारी व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे असभ्य वर्तन….लोकसभेतील गोंधळावर अमित शाह कडाडले

ऑगस्ट 21, 2025
crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
Chandrashekhar Bawankule

सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका….महसूलमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

ऑगस्ट 21, 2025
WhatsApp Image 2025 08 20 at 8.02.28 PM 1 1

पुण्यात या ठिकाणी २७७ कोटीचे दुमजली उड्डाणपुल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

ऑगस्ट 21, 2025
ladki bahin yojana e1727116118586

लाडकी बहिण योजनेचा जिल्हा परिषदेच्या ११८३ महिला कर्मचा-यांनी घेतला लाभ…सीईओंना दिले हे आदेश

ऑगस्ट 21, 2025
Untitled 34

सीडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकसह नागपूर येथे गुन्हा दाखल…मतचोरीचे केले होते ट्विट

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011