गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘कटेंगे’ वरून महायुतीतच ‘बटेंगे’! फडणवीस म्हणतात,‘अजितदादांसह अन्य लोकांना जनभावना समजल्या नसतील!’

नोव्हेंबर 16, 2024 | 6:00 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 36

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठे राजकीय वादंग उठले आहे. आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यापासून भाजपतील पंकजा मुंडे, अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अजित पवार आणि उत्तर प्रदेश, बिहारमधील अन्य नेत्यांनी दूर राहायचे ठरवले आहे. फडणवीस यांनी योगी यांच्या विधानांची पाठराखण करताना संबंधित नेत्यांना जनभावना समजल्या नसतील, अशी अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यांच्या मुलाखतीनंतरही अजितदांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ महाराष्ट्रात चालणार नाही, असे ठणकावले आहे.

आदित्यनाथ यांच्यावर ‘बटेंगे तो कटेंगे’ वरून टीका सुरू झाली; मात्र भाजप नेत्यांनी व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी योगींचा हा नारा उचलून धरला आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र ते या घोषणेशी सहमत नाहीत, असे स्पष्ट केले आहे. त्यापाठोपाठ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अशा घोषणेची आवश्यकता नसल्याचे सांगितले आणि नंतर त्यावरून घूमजावही केले. खासदार अशोक चव्हाण यांनीही या घोषणेपासून स्वतः ला दूर ठेवले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’असा नारा दिला; मात्र या दोन घोषणांमुळे महायुतीत जुंपली आहे. फडणवीस यांनी आदित्यनाथ यांची घोषणा उचलून धरली आहे, तर मोदी यांच्या घोषणेला महामंत्र म्हटले आहे;परंतु अजित पवार मात्र याविरोधात आहेत. यावर आता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत ते म्हणाले, “या लोकांना (अजित पवार व पंकजा मुंडे) जनतेच्या भावना समजल्या नसतील. त्यांना काहीतरी वेगळे बोलायचे असेल आणि तुम्ही प्रसारमाध्यमांनी काहीतरी वेगळा अर्थ घेतला असेल किंवा त्यांना योगींच्या वक्तव्याचा अर्थ समजला नसेल. हे लोक योगींशी असहमत असण्यामागे या तीनपैकी एखादे कारण असू शकते. अजित पवारांबद्दल बोलायचे झाल्यास ते गेल्या अनेक दशकांपासून अशा विचारांच्या लोकांबरोबर राहिले आहेत, जे स्वतःला सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) म्हणवून घेत आले आहेत. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत आले आहेत. त्यांचे धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखे आहे. हिंदुत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारधारा असलेल्या लोकांबरोबर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राहिले आहेत. त्यामुळे जनतेचा मिजाज (कल) समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल.

‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा, तर, त्याचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे असा आहे. यात काहीही चुकीचे नाही. मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेला महामंत्र म्हटले. कारण मोदी यांनी संपूर्ण समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एक मंत्र दिला आहे. आपण एकत्र राहिलो तरच आपला विकास होईल, असा त्यामागचा अर्थ आहे. काँग्रेस मात्र आपल्याला वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे, असे फडणवीस म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवार यांची पुन्हा जोरदार पावसात सभा…साताऱ्याच्या सभेची आठवण जागी

Next Post

‘बटेंगे’ला अजितदादांचा पुन्हा विरोध

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
ajit pawar11

‘बटेंगे’ला अजितदादांचा पुन्हा विरोध

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011