सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘कटेंगे’ वरून महायुतीतच ‘बटेंगे’! फडणवीस म्हणतात,‘अजितदादांसह अन्य लोकांना जनभावना समजल्या नसतील!’

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 16, 2024 | 6:00 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 36

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठे राजकीय वादंग उठले आहे. आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यापासून भाजपतील पंकजा मुंडे, अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अजित पवार आणि उत्तर प्रदेश, बिहारमधील अन्य नेत्यांनी दूर राहायचे ठरवले आहे. फडणवीस यांनी योगी यांच्या विधानांची पाठराखण करताना संबंधित नेत्यांना जनभावना समजल्या नसतील, अशी अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यांच्या मुलाखतीनंतरही अजितदांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ महाराष्ट्रात चालणार नाही, असे ठणकावले आहे.

आदित्यनाथ यांच्यावर ‘बटेंगे तो कटेंगे’ वरून टीका सुरू झाली; मात्र भाजप नेत्यांनी व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी योगींचा हा नारा उचलून धरला आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र ते या घोषणेशी सहमत नाहीत, असे स्पष्ट केले आहे. त्यापाठोपाठ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अशा घोषणेची आवश्यकता नसल्याचे सांगितले आणि नंतर त्यावरून घूमजावही केले. खासदार अशोक चव्हाण यांनीही या घोषणेपासून स्वतः ला दूर ठेवले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’असा नारा दिला; मात्र या दोन घोषणांमुळे महायुतीत जुंपली आहे. फडणवीस यांनी आदित्यनाथ यांची घोषणा उचलून धरली आहे, तर मोदी यांच्या घोषणेला महामंत्र म्हटले आहे;परंतु अजित पवार मात्र याविरोधात आहेत. यावर आता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत ते म्हणाले, “या लोकांना (अजित पवार व पंकजा मुंडे) जनतेच्या भावना समजल्या नसतील. त्यांना काहीतरी वेगळे बोलायचे असेल आणि तुम्ही प्रसारमाध्यमांनी काहीतरी वेगळा अर्थ घेतला असेल किंवा त्यांना योगींच्या वक्तव्याचा अर्थ समजला नसेल. हे लोक योगींशी असहमत असण्यामागे या तीनपैकी एखादे कारण असू शकते. अजित पवारांबद्दल बोलायचे झाल्यास ते गेल्या अनेक दशकांपासून अशा विचारांच्या लोकांबरोबर राहिले आहेत, जे स्वतःला सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) म्हणवून घेत आले आहेत. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत आले आहेत. त्यांचे धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखे आहे. हिंदुत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारधारा असलेल्या लोकांबरोबर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राहिले आहेत. त्यामुळे जनतेचा मिजाज (कल) समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल.

‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा, तर, त्याचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे असा आहे. यात काहीही चुकीचे नाही. मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेला महामंत्र म्हटले. कारण मोदी यांनी संपूर्ण समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एक मंत्र दिला आहे. आपण एकत्र राहिलो तरच आपला विकास होईल, असा त्यामागचा अर्थ आहे. काँग्रेस मात्र आपल्याला वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे, असे फडणवीस म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवार यांची पुन्हा जोरदार पावसात सभा…साताऱ्याच्या सभेची आठवण जागी

Next Post

‘बटेंगे’ला अजितदादांचा पुन्हा विरोध

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
ajit pawar11

‘बटेंगे’ला अजितदादांचा पुन्हा विरोध

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011