नाशिक – जोरदार पावसामुळे नाशिकचे गंगापूर धरण हे ९७ टक्के भरले आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सांयकाळी ५ वाजता १५०० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तर कडवा धरण क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे सांडवा विसर्ग संध्याकाळी ६ वाजता २२०० क्यूसेसने करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ७२ टक्के साठा आहे.. भावली, वालदेवी, हरणबारी , माणिकपुंज, आळंदी, नागासाक्या, कडवा ही सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तर नांदुरमधमेश्वर धरणात ९३ टक्के, दारणा ९८ टक्के, चणकापूर ९४ टक्के, पुनद ९६ टक्के साठा आहे. १३ हून अधिक धरणात ५० टक्के पेक्षा जास्त साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ९७ टक्के आहेत. तर समुहात ९० टक्के साठा आहे. भोजापूर व तिसगाव धरणात कमी साठा आहे.