नाशिक : शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी शनिवारी (दि.४) गळफास लावून आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. चेतनानगर येथील शुभेश्वर भालचंद्र मिश्रा (३१ रा.श्री दत्तात्रेय साई निवास अपा.कृष्ण मंदिराजवळ) यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास जेलरोड येथील पाटीदार भवन भागातील मोगल आर्किड इमारतीतील आपल्या कार्यालयातील पंख्यास बेडशिट बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी रूपेश कोकणे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गोसावी करीत आहेत. दुसरी घटना आनंदवली येथे घडली. नवनाथ श्रीपत साबळे (३७ रा.मायको कॉलनी) यांनी शनिवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता.ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक बागुल करीत आहेत.