नाशिक : द्वारका ते राणेनगर दरम्यान दमण येथील महिलेसोबत रिक्षा प्रवासात असलेलल्या सहप्रवाशांनीच बँगेतील २ लाख ३२ हजार ७५० रूपये लंपास केले. मंगल माधवराव क्षिरसागर (रा.खारीवाड नानी,दमण) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षिरसागर या बुधवारी वापी येथून बसने प्रवास करून शहरात दाखल झाल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या अॅटोरिक्षाने पाथर्डी फाटा भागात राहणा-या बहिणीच्या घरी जात असतांना ही घटना घडली. द्वारका येथून तीन प्रवासी महिला असलेल्या रिक्षात त्या बसल्या होत्या. महामार्गाने प्रवास करीत असतांना सहप्रवासी असलेल्या महिला आणि चालक एकमेकांचे साथीदार असल्याचा संशय तक्रारदार महिलेने केला असून, अडचण होत असल्याच्या बतावणी करीत संशयितांनी लक्ष विचलीत करून महिलेच्या बॅगेतील ४८ हजार ५०० रूपयांच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ३२ हजार ७५० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोंदळे करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : ५८ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील पंडितनगर भागात घडली आहे. या व्यक्तीचे आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अर्जुन दामोदर खरोटे (५८ रा.शक्ती रो हाऊस,भाद्रपद सेक्टर) असे आत्महत्या करणाºया व्यक्तीचे नाव आहे. खरोटे यांनी शुक्रवारी (दि.२७) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बैठक रूममध्ये लोखंडी हुकास चादर बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत अमित घोडके यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.