रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भयानक! ‘वडिलांनी कापला आईचा गळा, दार बंद करून आम्ही वाचवले जीव’ लहान बालिकेने केले कथन

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 28, 2022 | 5:15 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीमध्ये वाद होणे ही तशी सामान्य गोष्ट असते, परंतु वादाचे पर्यावसन मोठ्या भांडणात आणि भांडणातून हाणामारी आणि त्यातून एखाद्याचा खून होणे ही भयानक आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. त्यातच एखाद्या पतीने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून करणे ते ही बालकांदेखत हे अत्यंत क्रौर्य आणि निघृण प्रकार म्हणता येईल. या अमानुष प्रकाराला काय म्हणावे? असे अमानुष प्रकार घडणे समाजासाठी अत्यंत घातक आहे खरे म्हणजे ही माणसे नसून हे हैवाणच म्हणता येईल, अशा प्रकारची घटना बिहार मध्ये घडली. गोपालगंज जिल्ह्यातील मीरगंज हद्दीतील कासिम समील गावात सायंकाळी उशिरा परस्पर वादातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला. अंजू देवी (वय ३५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. दाई म्हणून काम करून त्या मुलांचा सांभाळ करत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती विजय साह याला अटक करून चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

प्रथमदर्शनी हे प्रकरण पती-पत्नीमधील वादातून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर कुटुंबातील इतर सदस्य घरातून पळून गेले आहेत, तर मृताच्या चार अल्पवयीन मुलांची प्रकृती बिघडली आहे. स्थानिक ग्रामस्थ त्यांना समजवण्याच्या प्रयत्नात व्यस्त होते.
या घटनेबाबत मृताची मुलगी पूजाने सांगितले की, सायंकाळी आई पाणी आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी वडिलांनी व इतर कुटुंबीयांनी आईचा गळा चिरून खून केला. तिने आणि तिच्या इतर तीन भावंडांनी कसातरी दरवाजा बंद करून आपला जीव वाचवला.
या घटनेसंदर्भात पूजाने आणखी सांगितले की, तिचे वडील विजय साह आणि आई यांचे १० वर्षांपासून भांडण झाले होते. दोघेही वेगळे राहत होते. वडील तिच्या मोठ्या आईच्या सांगण्यावरून वेगळे राहत होते, असा आरोप मुलीने केला आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली नाही. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होते. आई अंजू देवी काम करायची, त्यातून ती चार मुलांना खाऊ घालायची. घटनेनंतर त्याचे वडील, मोठी आई यांच्यासह सर्वजण घर सोडून पळून गेले. अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी कसेतरी त्या मुलांच्या आईवर अंत्यसंस्कार केले. मात्र अद्याप या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. परंतु तपास सुरू करण्यात आला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

LIC च्या IPOचा मार्ग मोकळा! आता ही गुंतवणूकही येणार

Next Post

शिपाई ते उद्योजक! कोपरगावच्या कारागीर पुत्राची यशोगाथा: ज्ञानेश्वर पगारे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
IMG 20220209 WA0067

शिपाई ते उद्योजक! कोपरगावच्या कारागीर पुत्राची यशोगाथा: ज्ञानेश्वर पगारे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011