बुधवार, ऑगस्ट 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतीय संघाच्या दोन्ही मालिका पराभवाला विराट विरुद्ध BCCI वादाची किनार ?

by Gautam Sancheti
जानेवारी 22, 2022 | 1:02 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेकडून तीन सामन्यांच्या मालिकेत पराभव झाला. टीम इंडियाने नऊ वर्षांनंतर आफ्रिकन भूमीवर वनडे मालिका गमावली आहे. शेवटच्या वेळी भारताचा २०१३ मध्ये पराभव झाला होता. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली हे सामने खेळण्यात आले. मात्र, झालेल्या पराभवामुळे चाहते निराश झाले आहेत.

मालिकेतील पराभवामागे अनेक कारणांची चर्चा होत आहे. काही क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की द्रविड संघासोबत योग्य समन्वय साधू शकला नाही. तसेच, विराट कोहली आणि बीसीसीआय वादाचा संघाच्या कामगिरीवर मोठा परिणाम झाल्याचे काहींचे मत आहे. राहुल द्रविड आणि केएल राहुल योग्य नियोजन करू शकले नाहीत, असेही म्हणले जात आहे. ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना त्यांनी संघाबाहेर ठेवले गेले. श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश पहिल्या सामन्यात अपयशी ठरले होते. अशा परिस्थितीत द्रविड आणि राहुल यांनी पहिल्या सामन्यानंतरच कठोर निर्णय घ्यायला हवे होते व टीममध्ये बदल करायला हवे होते. याशिवाय, आफ्रिकन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा, रुसी व्हॅनडर ड्युसेन यांसारख्या फॉर्मात असलेल्या फलंदाजांविरुद्ध संघाला योग्य नियोजन करता आले नाही. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा या दोघांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे आव्हान उभे केले. या सामन्यात येनेमन मलान आणि क्विंटन डी कॉक यांच्यासमोरही भारतीय गोलंदाज प्रभावी कामगिरी करू शकले नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, टी-२० कर्णधारपद सोडण्यापूर्वी मी कोहलीला समजावून सांगितले होते, पण त्यांनी ऐकले नाही. पत्रकार परिषदेत विराटने गांगुलीचा हा दावा फेटाळून लावला. यानंतर कर्णधार आणि बोर्ड आमनेसामने आल्याचे दिसून आले. त्यानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले.
या संपूर्ण प्रकरणामुळे खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मैदानात खेळण्यापेक्षा मैदानाबाहेर चाललेल्या या घडामोडींवर त्यांचे अधिक लक्ष होते अशी टीकाही केली जात आहे. या सगळ्याचा परिणाम खेळाडूंवर झाला आणि ते योग्य खेळू शकले नाही. परिणामी आपल्याला हार मानावी लागली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या बॉलिवूड ताऱ्यांनी घेतला सरोगसीचा आधार; बनले आई-बाबा

Next Post

नाशिक – लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीरसंबध ठेऊन, जीवे मारण्याची धमकी देणा-यांला पोलिसांनी केले गजाआड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime 1234

नाशिक - लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीरसंबध ठेऊन, जीवे मारण्याची धमकी देणा-यांला पोलिसांनी केले गजाआड

ताज्या बातम्या

IMG 20250806 WA0046 1

ताराचंद म्हस्के पाटील पुन्हा अजित पवार गटात दाखल

ऑगस्ट 6, 2025
upsc

यूपीएससीच्या भर्ती परीक्षांसाठीचे अलर्ट संदेश आता संस्थांना ईमेलद्वारे उपलब्ध होणार

ऑगस्ट 6, 2025
fir111

रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी १९ वर्षीय परप्रांतीय प्रवाशास लुटले…गुन्हा दाखल

ऑगस्ट 6, 2025
crime 1111

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 6, 2025
Untitled 62

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाला नवे वळण….ते हॅाटेल २८ वेळा बुक करण्यात आल्याचा या संस्थेने केला दावा

ऑगस्ट 6, 2025
4 1024x773 1

राज्य मराठी चित्रपट पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न…या कलाकारांचा झाला सन्मान

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011