शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केवळ तुमच्या शहरातच नाही तर देशात अचानक कसे काय सुरू झाले कोरोना मृत्यूसत्र?

जून 11, 2021 | 5:37 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असली तरी मृत्यूदर चिंताजनक स्थितीत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन हजार मृत्यू प्रतिदिवसावर स्थिर झालेला आकडा ९ जूनला अचानक ६ हजारांच्यावर पोहोचला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. बिहारमध्ये कोरोना मृत्यूदर जवळपास ७३ टक्क्यावर गेल्याने हा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, ७ जून २०२१ पर्यंत बिहारमध्ये कोरोनामुळे ५,४२४ लोकांचा मृत्यू झाला होता. (मार्च २०२० पासून मार्च २०२१ पर्यंतचा १,६०० मृत्यूंचा समावेश) परंतु बिहारमध्ये आतापर्यंत ५,४२४ मृत्यू नव्हे, तर ९,३७५ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय आणि जिल्हास्तरावरील पडताळणीमध्ये उघड झाली आहे. म्हणजेच बिहार सरकारकडे ३,९४१ लोकांचा आकडा नव्हता. यासंदर्भात पाटणा उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर दोन समित्यांचे गठण करण्यात आले. त्या संमित्यांच्या अहवालात हा आकडा समोर आला आहे.
बिहार सरकार अनभिज्ञ
या प्रकरणी वाद वाढल्यानंतर बिहारच्या आरोग्यमंत्र्यांनी सारवासारव केली. गावे आणि ग्रामीण भागातील मृत्यूचा आकडा अपडेट होऊ शकला नाही, असा दावा त्यांनी केला. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की १८ मे रोजी मृतांची ओळख पटविण्यासाठी गठित दोन समित्यांनी ८ जूनला अपला अहवाल सुपूर्द केला. त्यानुसार, कोरोनामुळे चार हजार लोकांचे मृत्यू झाल्याचा दुजोरा अहवालात देण्यात आला. या आकड्यांची सरकारकडे नोंदच नव्हती.
मृतांच्या नातेवाईकांना मदत
सरकारकडून दुजोरा मिळालेल्या मृतांच्या नातेवाईकांना चार चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत ३,७३७ लोकांना पैशांचे वाटपही झाले आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करणारे बिहार पहिले राज्य ठरले आहे.
उत्तराखंडमध्येही निष्काळजीपणा
उत्तराखंडमध्येसुद्धा कोरोना मृतांचा आकड्यांच्या बाबतीत निष्काळजीपणा समोर आला आहे. एप्रिल-मे २०२१ मध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी नियंत्रण कक्षाला पूर्ण आकडा उपलब्ध करून दिला नाही. १७ मे ते १० जूनपर्यंत राज्यात ७९८ आधी उपलब्ध नसलेल्या मृतांच्या आकड्यांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ६,८७८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयांमधील कर्मचार्यांची कमतरता आणि पोर्टलमधील किचकटपणामुळे आकड्यांची नोंद झालेली नाही, असा खुलासा करण्यात आला.
बिहारचे आकडे
– बिहारमध्ये दुसर्या लाटेमुळे गेल्या वर्षभराचे सर्व विक्रम मोडित निघाले आहेत. नव्या संक्रमित रुग्णांची संख्या एका दिवसात १५ हजारांच्यावर पोहोचली आहे.
– मार्च २०२० पासून मार्च २०२१ च्या दरम्यान राज्यात १६०० लोकांचा मृत्यू झालेला आहे.
– मार्च २०२१ ते आठ जूनच्या दरम्यान ७,७७५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. दुसर्या लाटेत राज्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत चाडेचार पट अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मृतांचा आकाडा प्रथमच सहा हजारांवर
बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यूंच्या दरात मोठी उसळी घेतल्याने देशात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा प्रथमच प्रतिदिन सहा हजारांवर गेला आहे. वल्डमीटरच्या माहितीनुसार, भारतात एका दिवसात १८ मे रोजी कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ४,५३५ नोंदविले होते. त्यापूर्वी ४,३४० मृतांची नोंद झालेली आहे. ८ जूनला बिहारमध्ये मृतांचा आकडा समोर आल्यामुळे ९ जूनला अचनाक उसळी घेऊन ६,१३८ वर पोहोचला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बँक ग्राहकांना भुर्दंड; आता एटीएम मधून पैसे काढण्यासाठी लागणार ज्यादा शुल्क

Next Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये  ८३ ने घट, ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरू

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये  ८३ ने घट, ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011