सोमवार, सप्टेंबर 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी…राज्यपालांना दिले पत्र

by Gautam Sancheti
सप्टेंबर 29, 2025 | 7:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
vijay wadettiwar

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अतिवृष्टी, पूरस्थिती, उद्ध्वस्त पिके, वाहून गेलेली जनावरे, कोसळलेली घरे आणि विस्कळीत वीजपुरवठा या गंभीर परिस्थितीत जनतेला तात्काळ दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे यासाठी राज्यपालांना पत्र लिहिल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ते म्हणाले की, राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, बाधित शेतकरी व नागरिकांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी याद्वारे केली.

राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह अनेक भागांमध्ये झालेल्या विक्राळ अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे वेधू इच्छितो. या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक पूर्णपणे संकटात सापडले असून त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे नुकसानीची आणि आपत्कालीन परिस्थितीची काही प्रमुख कारणे व सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहेत.

पीक आणि शेतीचे प्रचंड नुकसान-
राज्यात तब्बल ४ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या खरवडून गेल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्यभराचे श्रम मातीमोल झाले आहेत. या हंगामात ५ टक्के देखील उत्पादन हाती येण्याची शक्यता नाही.

मालमत्ता आणि जीवितहानी-
पूरपरिस्थितीत अनेक जनावरे वाहून गेली, घरे कोसळली आणि दुर्दैवाने जीवितहानी देखील झाली आहे. पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान-
वीजपुरवठा खंडित, विजेचे खांब व तारा कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे दळणवळण ठप्प-
गाव आणि शहरांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते खचल्याने वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे खंडित झाली आहे

आरोग्य समस्या-
पिण्याचे पाणी दूषित झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे.

ओला दुष्काळ जाहीर करावा-
राज्यात तातडीने ओला दुष्काळ, जाहीर करून बाधित शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी सरसकट, भरीव आर्थिक मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर करावे.

कर्जमाफी आणि नुकसानभरपाई-
नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या, कर्जमाफी आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच, पिकांचे आणि मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे, या तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी, तसेच जनतेला दिलासा देणारे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याचा आपण सरकारला आग्रह करावा.

G1 kHfMWwAAu97R
G1 kHfRWwAAc7IE

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, मंगळवार, ३० सप्टेंबरचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, मंगळवार, ३० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 29, 2025
dada bhuse
स्थानिक बातम्या

अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना तातडीने मदत करावी…मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

सप्टेंबर 29, 2025
vikhe patil e1706799134946 750x375 1
संमिश्र वार्ता

अतिवृष्टी बाधित गावांचा दौरा…मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणीसाठी केला दुचाकीचा वापर

सप्टेंबर 29, 2025
unnamed 7
संमिश्र वार्ता

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रभारी अध्यक्षपदी रविंद्र माणगावे….

सप्टेंबर 29, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरणार…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 29, 2025
IMG 20250929 WA0423
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये क्रीडा विभागातर्फे विकसित महाराष्ट्र २०४७ युवा व क्रीडा संवाद संपन्न…

सप्टेंबर 29, 2025
IMG 20250929 WA0369 1
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी गोदावरी परिसरात केली पूरपाहणी…प्रशासनाला दिले हे निर्देश

सप्टेंबर 29, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात सरासरी ११९ टक्के पाऊस…कोणत्या जिल्हयात किती? माहिती आली समोर

सप्टेंबर 29, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011