सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची आता ‘द-म-ओ’ची रणनीती!

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2021 | 11:35 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
rahul sonia priyanka

नवी दिल्ली – सन २०१४ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेस पक्षाला घरघर लागली आहे. या पराभवानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येसुद्धा काँग्रेस सावरताना दिसत नाहीये. काही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आली असली तरी ती टिकविण्याची धडपड करावी लागत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळत होणार्या निवडणुकांमध्ये वेगळी रणनीती आखून मोदी सरकारविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे नियोजन काँग्रेसने केले आहे.

काँग्रेसने आता रणनीतीमध्ये बदल केला असून, जातींचे समीकरणे सांभाळून धनाड्य वर्गालाही आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. काँग्रेसने ‘दमओ’ हा फॅक्टर चालविण्या निश्चित केले आहे. समाजातील दलित, महिला आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) या घटकांवर लक्ष केंद्रित करणे हा फॉर्म्युला याच रणनीतीचा भाग आहे. पक्षाच्या निर्णयांमध्ये समाजातील या तिन्ही वर्गांची छाप स्पष्टपणे दिसेल. २०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी हा फॉर्म्युला वापरण्याचे प्रयत्न काँग्रेस करणार आहे.

भाजप अनेक मुद्द्यांवर श्रीमंतांसोबत खांद्याला खांदा देऊन उभा असतो. त्यामुळे समाजातील दलित, मागासवर्गीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहावे, असे काँग्रेसच्या धुरिणांचे स्पष्ट मत आहे. २००४ मध्ये ‘काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ या स्लोगनद्वारे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. याच फॉर्म्युलाच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काबीज करता येईल, असा विश्वास काँग्रेसच्या गोटात व्यक्त केला जात आहे.

अंमलबजावणी सुरू
पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री बनविणे असो किंवा उत्तर प्रदेशात ४० टक्के महिलांना तिकीट देण्याची घोषणा असो. पक्षाकडून जवळपास प्रत्येक निर्णयात हा फॉर्म्युला वापरण्याचे प्रयत्न केले जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळ फेरबदलात याच फॉर्मुल्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अशाच प्रकारे विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने कंबर कसली आहे.

काँग्रेसपूर्वी भाजप, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने महिलांचा विश्वास जिंकून सत्ता काबीज केली होती. पंतप्रधान उज्ज्वला योजनेने २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या कन्याश्री योजनेने महिला मतदारांचा विश्वास जिंकण्याची मदत केली होती. दिल्लीमध्ये महिलांना मोफत बस प्रवासाची भेट देण्यात आली होती.

महिलांची भूमिका 
भाजपच्या विजयात महिलांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती, असे काँग्रेसच्या रणनीतीकारांचे मत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये महिलांच्या मतांची टक्केवारीही वाढली आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ४८ टक्के महिलांची संख्या आहे. परंतु मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या बरोबरीत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६८ टक्के महिलांनी मतदान केले होते. तर पुरुषांची मतांची टक्केवारी ६८.३ टक्के होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४९३; महानगरपालिका क्षेत्रात २०३ तर पंधरा तालुक्यात २७२ रुग्ण

Next Post

धक्कादायक! कौमार्य चाचणीचा व्हिडिओ प्रथमच आला समोर (बघा व्हायरल व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Capture 20

धक्कादायक! कौमार्य चाचणीचा व्हिडिओ प्रथमच आला समोर (बघा व्हायरल व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011