मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; बघा, काय म्हणाले ते?

by Gautam Sancheti
डिसेंबर 12, 2022 | 9:47 pm
in राज्य
0
Nana Patole1

अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्रात थोर पुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्याची राजकीय नेत्यांमध्ये जणू काही चढाओढ लागलेली दिसून येते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काही नेते विनाकारणच बेताल किंवा वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यातून मोठे वादंग निर्माण होऊन समाजातील सर्व राज्यातील वातावरण बिघडते. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते त्रिवेदी आणि आमदार प्रसाद लाड यांनी थोर पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना आता त्यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे, ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.

नाना पटोले म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपल्या समाजाचे नेतृत्व तसे राहावे असे वाटणे हे काही गैर नाही. कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज, दि१२ रोजी अकोल्यातील एका कार्यक्रमात केले. ते जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील कुणबी समाजाच्या कार्यक्रम ठिकाणी माध्यमांशी बोलत होते.

आधी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता नाना पटोले यांच्या वक्तव्यानेही सर्व समाजामध्ये विपर्यास निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्यांनी शिवरायांबाबत केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उसळण्याची शक्यता आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य कसे असावे याचे राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी समाज हा अन्नदाता आहे, देशाचा पोशिंदा आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या तुम्ही करू नका. ज्या व्यवस्थेने तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, त्या व्यवस्थेला आत्महत्या करण्यास तुम्ही भाग पाडा, असे आवाहन करण्यासाठी मी इथे आलो आहे.

कुणबी समाज व ओबीसी समाजामध्ये माझ्यापेक्षा ही अनेक नेतृत्व आहेत. वेळ आणि नशीब हे प्रत्येकाचे कसे असते हे त्यावर सर्व अवलंबून आहे. प्रत्येकाला समाजाचे देणे लागते. प्रत्येकाची समाजासाठी कार्य करण्याची जबाबदारी असते. माझ्या अपेक्षा काय असतील या पेक्षा माझ्या समाजाच्या व ओबीसी समाजाच्या अपेक्षा काय आहे, यासाठी काम करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून काम करण्याचा माझा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरही पटोले यांनी टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्याकडून विदर्भातील जनतेची मोठी अपेक्षा होती. आज विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. येथील प्रकल्प गुजरातला जात आहेत. दौऱ्यामुळे कुठलाच फायदा झाला नाही, उलट निराशा झाली. या दौऱ्यासाठी मोठा खर्च आणि वेळ वाया गेला. तर हा दौरा म्हणजे जनतेला वेठीस धरणारा होता, असा आरोप नाना पटोले यांनी केला असून समृद्धी महामार्गामुळे फक्त काही नेते व अधिकाऱ्यांचीच समृद्धी झाली. लवकरच त्याचे पुरावे बाहेर काढू, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

Congress State Chief Nana Patole on Chhatrapati Shivaji Maharaj

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – १३ डिसेंबर २०२२

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – आई-वडिलांचं लग्न

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Untitled 22
संमिश्र वार्ता

नाशिकहून एअरलिफ्ट करण्यासाठी हॅलिकॉप्टर…बीडमध्ये बचाव कार्याला गती

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक…बघा, शासनाचा निर्णय

सप्टेंबर 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आर्थिक स्थिती आनंद देईल, जाणून घ्या,मंगळवार, १६ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - आई-वडिलांचं लग्न

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011