रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘२-३ अब्जाधीश मित्रांसाठी मोदींनी केली नोटबंदी’, राहुल गांधींची टीका

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2022 | 6:10 pm
in संमिश्र वार्ता
0
Rahul Gandhi 1 e1706697653225

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नोटाबंदीला ६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदीवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, हे २-३ अब्जाधीश मित्रांच्या फायद्यासाठी केले गेले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पीएम मोदींवर टीका करताना ‘PayPM’ असे लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अर्थव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.

राहुल गांधी हे पहिल्यापासूनच यावर आक्रमक आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला, त्यात लिहिले, “नोटाबंदी ही ‘PayPM’ ची जाणीवपूर्वक चाललेली चाल होती, जेणेकरून त्यांचे २-३ अब्जाधीश मित्र लहान आणि मध्यम व्यवसायांचे उच्चाटन करून भारताच्या अर्थव्यवस्थेची मक्तेदारी करू शकतील.”
भारतात नोटाबंदी ६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे, काळ्या पैशाला आळा घालणे आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा नष्ट करणे हा होता. तथापि, विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या २०१६ च्या नोटाबंदीच्या निर्णयाला “आर्थिक नरसंहार आणि गुन्हेगारी कृत्य” असे म्हटले आहे.

नोटाबंदीला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसने सांगितले की, मोदी सरकारच्या या निर्णयानंतर चलनात रोख ७२ टक्क्यांनी वाढली असून सरकारने त्यावर ‘श्वेतपत्रिका’ आणावी. पक्षाचे नेते गौरव वल्लभ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचे हे भयंकर अपयश स्वीकारले पाहिजे. ते पत्रकारांना म्हणाले, “८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस सर्वांच्या स्मरणात असेल. भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या निर्णयाला आज सहावा वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदीला ५० दिवस उलटूनही आजपर्यंत सरकारने नोटाबंदीचे नावही घेतलेले नाही.”

वल्लभ यांनी दावा केला, “भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी संघटित लूट सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीच्या माध्यमातून केली होती.” ते म्हणाले, “अर्थव्यवस्थेतील रोख चलनात गेल्या सहा वर्षांत ७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये अर्थव्यवस्थेत चलनात असलेली रोख रक्कम १७.९७ लाख कोटी रुपये होती, जी आज ३०.८८ लाख कोटी रुपये झाली आहे.”

Demonetisation was a deliberate move by ‘PayPM’ to ensure 2-3 of his billionaire friends monopolise India’s economy by finishing small & medium businesses. pic.twitter.com/PaTRKnSPCx

— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 8, 2022

Congress MP Rahil Gandhi on Demonetisation 6 Years

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाट्यसंस्थांसाठी सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

Next Post

नाशिकच्या ईश्वरी सावकारची इंडिया बी संघात निवड; श्रीलंका व वेस्ट इंडीज मालिकेत खेळणार

Next Post
Ishwari Sawkar

नाशिकच्या ईश्वरी सावकारची इंडिया बी संघात निवड; श्रीलंका व वेस्ट इंडीज मालिकेत खेळणार

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0239

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन…

जून 1, 2025
ajit pawar11

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…७ आमदारांनी सोडली साथ

जून 1, 2025
nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011