विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जात सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. अनेक निवडणूकांमध्ये अपयशी ठरलेल्या या पक्षाला पुन्हा एकदा अपयश का आले किंबहुना यशापासून वारंवार दूर का राहावे लागत आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विशेषत: आसाम आणि केरळसारख्या राज्यांत पक्षाला विजय मिळवता आला असता. मात्र येथेही पराभव झाला आहे. कारण कॉंग्रेस अजूनही आपल्या रणनीती व नेतृत्त्वाच्या धोरणात बदल करण्यास तयार नाही. तसेच मागील घटना घडामोडींपासून धडा घेण्यास तयार दिसत नाही. आता या पक्षाच्या अपयशाची कारणे जाणून घेऊ या…
जनतेचे मत जाणून घेणे
या निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे की, कॉंग्रेसचे विद्यमान नेतृत्व एंटी-इन्कंबेंसीनंतरही जनमत जिंकू शकलेले नाही किंवा जाणून घेऊ शकले नाही. कॉंग्रेसच्या कमकुवत निवडणुकीच्या कामगिरीमुळे पक्षात गदारोळ होण्याची शक्यता वाढली आहे.









