बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

काँग्रेसने का बदलला पंजाबचा मुख्यमंत्री? हे आहे कारण

by Gautam Sancheti
सप्टेंबर 19, 2021 | 11:17 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
amrinder

चंदीगड – पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताविरोधी वातावरण आणि काँग्रेस पक्षातील वर्चस्वाच्या लढाईत एकटे पडलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अखेर मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना वेळ दिला जात होता. परंतु संकेत समजण्यास कॅप्टन यांना अपयश आले. आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यात कॅप्टन कमी पडतील याची कुणकुण काँग्रेस नेतृत्वाला लागली होती. शेतकरी आंदोलनाबाबत त्यांचे वक्तव्य आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश हेच त्यांच्या जाण्यास कारणीभूत ठरेल आहे. आम आदमी पक्षाकडून आक्रमकपणे प्रचार होत असताना त्यांच्या आव्हानाला कॅप्टन प्रतिकार करतील का हाच यक्ष प्रश्न काँग्रेसमध्ये उपस्थित होत होता. त्यामुळे अखेरच्या क्षणी काँग्रेसने बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसच्या या निर्णयाने निवडणुकीतील आव्हाने वाढली आहेत. मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा दिल्यानंतर भविष्यातील पर्याय खुले आहेत, असे कॅप्टन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही दुसर्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपद सुपूर्द करून कॅप्टन शांत बसणार नाहीत हेसुद्धा स्पष्ट होत आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासात प्रथमच त्यांना कोणीतरी आव्हान दिले आहे. पंजाब काँग्रेसच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा एकसूत्री कारभार राहिला आहे. त्यांनी १९९८ मध्ये आपल्या अकाली दल (पंथिक) पक्षाचा काँग्रेसमध्ये विलय केला होता. चार वर्षांनंतर २००२ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसला कॅप्टन यांच्यामुळेच यश मिळाले आहे हेही नाकारता येणार नाही. परंतु गेल्या साडेचार वर्षांत निवडणुकीतील आश्वासनांना पूर्ण करण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला अनेक वेळा त्यांना दिल्लीला बोलावून निर्देशही द्यावे लागले. आता काँग्रेसकडे कोणता प्रर्याय आहे हा प्रश्न आहे. कॅप्टन सध्या योग्य वेळेची वाट पाहतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याचे म्हणणे आहे. त्यांच्यानंतर काँग्रेसकडून कोणाला मुख्यमंत्री बनविले जाते हेही ते बघतील, त्यानंतरच पुढील निर्णय घेतील.

भविष्यातील राजकारणासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे जास्त पर्याय नाहीत. शेतकरी आंदोलनामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. तसेच कॅप्टन यांच्या अपयशाचे खापर भाजप स्वतःच्या माथी घेणार नाही. त्यांचे वयही वाढले आहे. आम आदमी पक्षाने त्यांच्याविरुद्ध मोठा प्रचार केला आहे, त्यामुळे आप त्यांना सोबत घेणार नाही. त्यामुळे नवा पक्ष स्थापन करण्याचाच पर्याय त्यांच्याकडे दिसतो आहे. काँग्रेस सोडल्यानंतर कॅप्टन यांच्यासोबत किती आमदार जातील हे सांगणे कठीण आहे. कॅप्टन यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, कॅप्टन यांना सिद्धू यांच्यापेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असता तर त्यांनी विधीमंडळ दलाच्या बैठकीआधी राजीनामा दिला नसता. त्यामुळे पक्षातच राहून ते योग्य वेळेची वाट पाहतील आणि त्यानंतर भविष्यातील निर्णय घेतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बंगालमध्ये भाजपला मिळणार आणखी झटके ; असे आहे समीकरण…

Next Post

पृथ्वी प्रदक्षिणा करून चारही सर्वसामान्य नागरिक येथे उतरले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
KAPqGAtD

पृथ्वी प्रदक्षिणा करून चारही सर्वसामान्य नागरिक येथे उतरले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

ashish shelar

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल झाल्यानंतर आशिष शेलार म्हणाले भर पावसात तोंडावर आपटले, भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत

ऑगस्ट 20, 2025
GyxdQ aXcAA4tot e1755671894349

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणा-या व्यक्तीचे नाव व फोटो आले समोर

ऑगस्ट 20, 2025
rekha gupta 1

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला…जनता दरबार दरम्यान घटना

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र

ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट फेल…बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक रावच्या पॅनलला १४ जागा तर महायुतीला इतक्या जागा

ऑगस्ट 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित 1 1024x606 1

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५ हजार ८९२ रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती…हे झाले १० सामंजस्य करार

ऑगस्ट 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील बहुतांश भागात या तारखे पासून पावसाचा जोर ओसरणार

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011