केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केरळची सूत्रे पुन्हा एकदा पी. विजयन ह्यांच्याकडे आली आहेत. आलटून पालटून सत्ता परिवर्तन होणाऱ्या केरळमध्ये सतत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा एक विक्रमच त्यांनी केलेल्या आहे. पिनराई विजयन हे केरळमधले एक लोकप्रिय आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. पंचाहत्तर वर्षांचे विजयन हे एक उत्तम प्रशासक आणि कर्तव्यकठोर नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच सतत दुसऱ्या वेळी शासनाची सूत्रे त्यांच्या हाती येत आहेत असे म्हणावेच लागेल.

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत)
ई मेल – [email protected]
ते भागातल्या एका अतिशय गरीब कुटुंबातले. त्यांचे वडील शेतमजूर म्हणून ताडफळे काढण्याचे काम करीत असत. त्यामुळे त्यांचे लहानपण खूप कष्टात गेले. सहाजिकच शिक्षणासाठी त्यांना झगडावे लागले. शालेय शिक्षण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या विजयन यांना स्वतःला काही काळ हातमागावर मजुरी करावी लागलेली होती. थाल्लासेरीच्या ब्रेन्नन कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. विद्यार्थी असल्यापासूनच राजकारणाकडे त्यांचा ओढा होता त्यामुळे विद्यार्थी चळवळीकडे ते ओढले जाणे क्रमप्राप्तच होते. त्याच काळात त्यांचा संपर्क डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांशी आला. केरळ स्टुडंट्स फेडरेशनचे सरचिटणीस आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. केरळ सोशालिस्ट युथ फेडरेशनच्या अध्यक्षपदावरसुद्धा त्यांनी काम केले. ह्याच काळात डाव्या विचारांमध्ये अतिरेकी नक्षलवाद वाढत होता. पण केरळमध्ये ज्या नेत्यांमुळे डाव्या विचारांच्या मुख्य प्रवाहापासून अतिरेकी डावा नक्षलवाद दूर ठेवला गेला त्यात विजयन यांचे नाव खूप वरच्या क्रमावर घ्यावे लागते. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी कन्नूर जिल्ह्यातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कन्नूर जिल्ह्याच्या समितीच्या सदस्यपदावर त्यांची निवड झाली. याच काळात त्यांना दीडएक वर्षे तुरुंगवासही घडला. तुरुंगात त्यांचा शारीरिक छळदेखील झाला. त्यानंतर केरळ राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर त्यांची निवड झाली. त्याच काळात सीपीएमच्या राज्य सचीवपदावर त्यांची निवड झाली. राजकारणातल्या त्यांच्या वाटचालीत विधीमंडळाचा टप्पा येणे अपरिहार्यच होते.
१९७० मध्ये वयाच्या अवघ्या पंचविशीत असतांनाच कुठूपाराम्बा ह्या मतदारसंघातून ते केरळच्या विधानसभेत निवडून गेले. त्यानंतरची जवळपास पंचेचाळीसपेक्षा जास्त वर्षे ते केरळच्या राजकारणात अग्रस्थानी राहिलेले आहेत. केरळ विधानसभेवर पाच वेळा निवडून आलेले ते एक जेष्ठ विधिमंडळ सदस्य आहेत. यातली महत्वाची गोष्ट म्हणजे १९७० पासून २०१६ पर्यंतच्या ज्या निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत त्यांच्यात त्यांचे मताधिक्य सतत वाढते राहिलेले आहे.
१९९६ मध्ये इ.के.नयनार मंत्रीमंडळात उर्जा आणि सहकार खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात राज्याच्या विजेच्या उत्पादनात आणि वितरणाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली होती . सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांना त्यांच्या सहकारी चळवळीतल्या अनुभवाचा खूपच उपयोग झाला . ते एक प्रभावी आणि कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जात असत पण आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीचा खूप मोठा काळ त्यांनी संघटनात्मक कामात ते राहिलेले आहेत. त्यामुळेच सीपीएमच्या केरळमधल्या संघटनात्मक जडणघडणीत त्यांचे योगदान विशेष महत्वाचे राहिलेले आहे. त्यामुळेच बहुधा केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे केरळमधले सर्वाय दीर्घ काळ सेक्रेटरी राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे.










