गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष – तरंग – पावसाने केली मुंबईकरांची वाताहत 

by India Darpan
जून 13, 2021 | 12:20 am
in इतर
0
E3cJEdJVEAkBWu0

पावसाने केली मुंबईकरांची वाताहत 

बहुप्रतिक्षित मान्सूनचे आगमनाने सर्वच सुखावले असले तरी राजधानी मुंबईची मात्र वाताहत झाली आहे. अर्थात त्यासाठी पावसाला दोष देणे योग्य नाही. तर पावसाळा पूर्व उपाययोजना कारणीभूत आहेत. राजधानीची ही अवस्था काही पहिल्यांदाच होत नाही, हेच दुर्देव आहे.
अशोक पानवलकर
लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत.
ब्लॉग – https://ashokpanvalkar.com
 मुंबईची वाताहत हा प्रश्न अनेक वेळा चर्चिला गेला आहे. अनेक खर्चिक उपाय सुचविण्यात आले आणि प्रत्यक्षात केलेही गेले. परंतु मुंबई काही सुधारली नाही. प्रचंड लोकसंख्या, वाहतुकीवर येणार ताण, पाणीपुरवठ्याचे प्रश्न, घरांची समस्या अशा  अनेक अडचणी मुंबईला भेडसावत आहेत. मुंबईचा आडवा विस्तार व्हायला जागा नाही, म्हणून उभा विस्तर व्हायला लागला, परंतु तो सर्वांच्या आवाक्यात नव्हता. अजूनही नाही. अशा या मुंबईत पावसामुळे साठणारे पाणी, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या दरवर्षी येतात. हे पाणी वाहून जावे म्हणून नालेसफाई आवश्यक असते. ती आम्ही चोखपणे केली असे देशात सर्वात श्रीमंत असणारी मुंबई महापालिका म्हणते, तर ‘ही नालेसफाई नव्हे, तर हातसफाई’, अशी टीका विरोधी पक्ष करतो.
पावसाळा तोंड देण्यासाठीची यंत्रणा सज्ज आहे असे पालिका सांगत असतानाच गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने हा दावाच वाहून जाऊन समुद्राला मिळाला. दोन्ही दावे -प्रतिदाव्यांमध्ये हाल होतात ते मुंबईत राहणाऱ्या नागरिकांचे. सध्या कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ चालू असल्याने बऱ्याच जणांना पाण्यात उतरावे लागले नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. परंतु, अत्यावश्यक सेवांमधील लोकांना जावेच लागले, त्यांचे हाल झालेच.
मुंबईची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर जास्त पाऊस झाल्यावर पाणी साठणार हे उघड आहे. त्यामुळे महापालिका हेच कारण नेहेमी सांगते. ‘पाऊसच एवढा पडला, आम्ही काय करू’, ही सबब मुंबईकर गेली काही वर्षे ऐकत आहेत. परंतु, पूर्ण नालेसफाई, रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी साफ गटारे या सोयी आपण खरेच नागरिकांना देतो का याचा विचार महापालिकेला करावा लागेल.

E3hEYJaUcAMXuME

मुंबईत पाणी साठू नये म्हणून मुंबईत काही मोठे प्रकल्प राबविण्यात आले. आता तर भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोगही करून पाहण्यात आला. परवाच्या पावसात या टाक्याही लगेच भरून गेल्या, कारण अजून काम अर्धवट आहे. आता हे काम यावर्षी पूर्ण झाले नाही तर पुढच्या वर्षी या टाक्यांचा नक्की फायदा होईल, असे स्वप्न महापौरांनी दाखवले आहे.
काही वर्षांपूर्वी २६ जुलैच्या जलप्रलयानंतर राज्य सरकारने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची शिफारस केली होती. मागील तब्बल १५ वर्षांपासून हा प्रकल्प उभारणे सुरु आहे.  मुंबईत पर्जन्यजलवाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची प्रतितास क्षमता २५ मिमीवरून ५० मिमी करण्यात आली. मात्र १५ वर्षांत स्थितीत बदल झालेला नाही. प्रकल्पाचा खर्च वाढत चालला आहे. या प्रकल्पावर आत्तापर्यंत २,२३८.०४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  २६ जुलैच्या जलप्रलयाला अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक असलेल्या मिठी नदीचे काम तब्बल पंधरा वर्षांनंतरही सुरूच आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासोबत पालिका व एमएमआरडीएतर्फे नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. एकूण १७.८४ किमी लांबीच्या मिठी नदीतील ११.८४ किमीचे क्षेत्र पालिकेच्या तर सहा किमी एमएमआरडीएच्या अखत्यारित आहे. एमएमआरडीएचे काम पूर्ण झाले असून पालिकेचे काम अद्याप पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या प्रकल्पासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे.
अतिवृष्टीच्या काळात समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीच्या वेळेत पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी स्टेशन प्रस्तावित करण्यात आली. त्यापैकी सहा पम्पिंग स्टेशनची कामे पूर्ण होऊन सुरू झाली आहेत. उर्वरीत दोन  पम्पिंग स्टेशनसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. सर्व पम्पिंग स्टेशनसाठी ५०० कोटींहून अधिक खर्च झाला आहे. यासोबतच नालेसफाईसाठी दरवर्षी ७० ते १०० कोटी रुपये खर्च केले जातात. त्यानंतरही पाणी तुंबण्याची समस्या कायम आहे.

E3c20 FWEAEKYMU

दरवर्षी पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी साचून नागरिकांना त्रास होतो. पाण्याचा निचरा करण्यासाठी हिंदमाता उड्डाणपुलाखाली अडीच हजार क्युबिक मीटर तसेच सेंट झेवियर मैदानात ३० हजार क्युबिक मीटर आणि दादर पश्चिमेला प्रमोद महाजन उद्यानात सुमारे ६० भूमिगत टाक्या बांधल्या जात आहेत. या टाक्यांमध्ये साठवलेले पाणी पर्जन्यजलवाहिन्यांमार्फत समुद्रात सोडले जाणार आहे. या कामांसोबत  दक्षिण मुंबईतील पाण्याचा निचरा करण्यासाठी जलबोगदा बांधला जाणार आहे. या सगळ्या कामांसाठी तीन हजार कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. तरीही त्याचे दृश्य परिणाम कधी दिसणार हा प्रश्नच आहे.
ही कोट्यवधींची कामे जितकी लांबतील तेवढी खर्चात वाढ होईल. हा खर्च वाढूनही पाणी साठणार नाही, याची हमी कोणीही देऊ शकत नाही. म्हणून या प्रकल्पांचा काही उपयोग नाही, असे मी म्हणणार नाही. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करायलाच हवेत. मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु झाली आहे. लवकरच सगळ्या कंपन्या, सरकारी कार्यालये टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने सुरु होतील अशी आशा करू या.
मुंबईतला पावसाळा आता कुठे सुरु होतो आहे. पहिल्या पाच दिवसातच महिन्याभराचा पाऊस मुंबईत पडला आहे. १३ व १४ जूनला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहेच. त्यामुळे मुंबईकरांच्या मनात धडकी भरलेली आहेच. पावसाळ्याची सुरुवातच इतक्या धडाक्याने व्हावी हे मुंबईकरांच्या पचनी  पडणारे नाही. याआधी पाऊस एक दिवस मुंबईची तुंबई करतो, ‘मुंबई बंद’ पुकारतो, पण नंतर शहाण्यासारखा वागतो, असा मुंबईकरांना अनुभव आहे. यावेळी वेगळेच घडत आहे.
पर्यावरण आणि हवामानतज्ज्ञांनी या बदलाची जाणीव आधीच करून दिली आहे. पश्चिम किनारपट्टीवर सहसा न येणारी वादळे यापुढे नियमित येतील आणि त्यांचे स्वरूप अधिक रौद्र असेल, असा इशारा मिळालाच आहे. हा फटका केवळ मुंबईलाच किंवा महाराष्ट्रालाच नाही तर गोवा, गुजरात वगैरे सगळ्यांना फटका बसणार आहे. पर्यावरण बदलाचे आणखी धोकेही तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. या सगळ्यापासून आपण धडा शिकणार आहोत का हा खरा प्रश्न आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीरमच्या पुनावालांसह अनेकांवर गुन्हा दाखल; हे आहे कारण

Next Post

साप्ताहिक राशिभविष्य – १३ ते २० जून

India Darpan

Next Post

साप्ताहिक राशिभविष्य - १३ ते २० जून

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011