सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – तरंग – झिंदा, है तो प्याला, पूरा भर दे

जून 20, 2021 | 12:35 am
in इतर
0
E4NO20KUYAYyU 9

जिंदा, है तो,  प्याला, पूरा भर दे …२०१३मध्ये झळकलेल्या ‘भाग मिल्खा भाग ” नावाच्या चित्रपटाचे लेखक आहेत प्रसून जोशी. हिंदी साहित्य, सिनेसृष्टी यांच्यातील दिग्गज नाव. नामवंत धावपटू मिल्खासिंग यांच्यावर हा चित्रपट निघाला होता. दिग्दर्शक होते राकेश ओमप्रकाश मेहरा. त्या चित्रपटात प्रसून जोशी यांनी हे गाणे लिहिले होते. प्रत्यक्षात मिल्खासिंग यांचे जगणे कसे होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मिल्खासिंग  आयुष्य भरभरून जगले. परवा कोरोनाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले तेव्हा त्यांचे वय ९१ होते. परंतु, अजूनही खूप जगण्यासारखे आहे, जीवन आनंदी आहे,” हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांच्या पत्नी निर्मल कौर या ८५ वर्षांच्या. त्या स्वतः व्हॉलीबॉल चॅम्पियन व संघाच्या कर्णधार होत्या. दोघेही मनाने तरुण होते. निर्मल कौर यांचे मिल्खासिंग जाण्याच्या पाचच दिवस आधी कोरोनामुळेच निधन झाले.
IMG 20200829 WA0014
अशोक पानवलकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
[email protected]
चित्रपटाच्या निमित्ताने दोन वर्षे प्रसून जोशी त्यांना सतत भेटत होते. मिल्खासिंग यांचे आयुष्य समजून घेत होते. त्यांना अनेक विषयांवर बोलते करत होते. मिल्खासिंग याना फार महत्वाच्या न वाटलेल्या गोष्टीही प्रसूनजी  अनेक वेळा वदवून घेत होते. सगळ्यांचे संदर्भ जोडून चित्रपट कथा तयार करत होते. इंग्रजीत ज्याला Never  Say  Die असे म्हणतात अशा वृत्तीचे मिल्खासिंग होते. ‘भाग मिल्खासिंग  भाग  ‘ चित्रपट पाहून मिल्खासिंग बऱ्यापैकी समाजात असे आपल्याला वाटेल, परंतु ते एक बहुरंगी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनाला अनेक पैलू होते. चित्रपटात त्यांच्या वास्तव आयुष्यातील रोमँटिक वृत्तीला दाद देणारी ‘मेरा यार’ आणि ‘ओ रंगरेझ ” ही गाणी आहेत. ‘ए मिल्खा भाग ‘ हे गाणेही त्यांच्याबद्दल बरेच काही सांगते.
E4N75ofWYAA7VHX
कोरोनाने अनेक क्षेत्रांमधून अनेक महत्वाच्या व्यक्तींना आपल्यातून नेले. क्रीडा क्षेत्रालाही त्याची झळ पोचली.  मिल्खासिंग हे त्यातले सर्वात ताजे उदाहरण. त्यांचे सुपुत्र जीव मिल्खासिंग  हेही क्रीडा क्षेत्रातील असून उत्तम गोल्फपटू आहेत. मिल्खासिंग यांनी आशियाई गेम्समध्ये चार सुवर्णपदके मिळाली होती. १९६० सालच्या रोम ऑलीम्पिकमध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ते चौथे आले होते. ब्रॉंझपदक थोडक्यात हुकणे म्हणजे काय हे त्यांनी अनुभवले होते. तो सल त्यांच्या मनात कायम असेल यात शंका नाही. हे पदक हुकले ते केवळ ०.१ सेकेंडणे. ”ही माझी सर्वात वाईट आठवण आहे”, असे ते म्हणत असत. तसे पाहिले तर मिल्खासिंग याना  आयुष्यात बऱ्याच अडचणी, दुःखे याना सामोरे जावे लागले. मूळ पाकिस्तानात असताना फाळणीच्या वेळेस झालेली कुटुंबाची वाताहत खूप मोठा परिणाम करून गेली. १९४७ मध्ये ते भारतात आले.  १९५१मध्ये ते भारतीय लष्करात सामील झाले. खरे म्हणजे ते ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत नव्हते. परंतु, लष्कराच्या एका अंतर्गत स्पर्धेसाठी त्यांच्या तुकडीकडून ४०० मीटर धावण्यासाठी कोणीही खेळाडू उपलब्ध नव्हता. तेव्हा तुकडीप्रमुखानी मिल्खासिंग याना विनंती केली. आव्हान स्वीकारणे हा तर त्यांचा स्वभावच होता. ते त्यांनी नुसते स्वीकारले नाही, तर त्यात प्रावीण्यही मिळवले. अमेरिकेचे तेव्हाचे धावपटू चार्ल्स जेनकिन्स याना त्यांनी आदर्श मानले होते. त्यांचा ४६.७ सेकेंडचा विक्रम होता. मिल्खासिंग यांनी हा आकडा एका चिट्ठीवर लिहून गुरु नानक यांच्या तसबिरीजवळ ठेवला होता. रोज आठवण यावी म्हणून. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी ही शर्यत ४६.६ सेकांदात पूर्ण केली. तेव्हाचे विश्वविजेते स्पेन्स यांना त्यांनी ०.३ सेकांदानी मागे टाकले. हा विजय इतका महत्वाचा होता की लगेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मिल्खासिंग याना फोन केला आणि ‘तुमची काय इच्छा आहे ते सांगा, मी पूर्ण करीन ‘, असे विचारले. मिल्खासिंग एवढेच म्हणाले, ” माझा विजय साजरा करता यावा म्हणून तिथे सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, मला स्वतःला काहीच नको”…
मिल्खासिंग याना १९६० मध्ये एका स्पर्धेसाठी पाकिस्तानला बोलावल्यावर त्यांनी प्रथम नकार दिला. पण नंतर ते गेले. स्पर्धेत पाकिस्तानचे अब्दुल खालिक त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. स्टेडियममधील प्रत्येकाचा खलिक यांनाच असणे स्वाभाविक होते. तरी मिल्खासिंग  यांनी स्पर्धा जिंकलीही. तेव्हाचे पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. ते मिल्खासिंग  याना पुरस्कार देताना म्हणाले, ”अरे तू धावला नाहीस. तू उडत होतास, तू फ्लायिंग शीख आहेस. ”. तेव्हापासून मिल्खासिंग फ्लायिंग शीख झाले. मिल्खासिंग यांच्या निधनानंतर अक्षरशः प्रत्येक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. ते स्वाभाविक म्हटले पाहिजे. कारण ते देशाचे श्रद्धास्थान होते.
E4NZXnLVkAEp EE
अशा माणसाने एकदा देशाबद्दल खंतही व्यक्त केली. त्यांना २००१मध्ये अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. तो त्यांनी नाकारला. त्याचा खुलासा त्यांनी २०१४मध्ये केला. ”हल्ली प्रसादासारखे पुरस्कार दिले जातात. मला पद्मश्री दिल्यानंतर अर्जुन पुरस्कार देणे म्हणजे मास्टर्स डिग्री मिळविल्यावर एसएससी (दहावी) चे प्रशस्तिपत्रक देण्यासारखे आहे”. अशा व्यक्तीला किमान पद्मभूषण देणे आवश्यक होते असे राहून राहून वाटते.
मिल्खासिंग  यांनी धावण्याच्या ट्रॅकवर किती पुरस्कार मिळाले, त्यांनी कायकाय मिळवले याची यादी इथे देण्याची गरज नाही. पण अधिकृत निवृत्त झाल्यावरही मिल्खासिंग क्रीडा क्षेत्राला एक मार्गदर्शक म्हणून राहिले. स्वतःचे नाव अजरामर केले आणि भारताचेही. कोरोनाने ज्या भारतीय क्रीडापटूंचे आयुष्य हिरावून घेतले तेही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले ‘दादा ‘ होते. त्यामुळे आपले झालेले नुकसान प्रचंड आहे. अहमद हुसेन (फुटबॉल), चेतन चौहान (क्रिकेट) , सुरेशकुमार ठाकूर (हॉकी), विवेक बेंद्रे (क्रीडा छायाचित्रकार), चंद्रो तोमर (शूटर) , किशन रुंगठा (क्रिकेट), रवींद्र पाल सिंग आणि एम के कौशिक (दोघेही हॉकीपटू) , वेणुगोपाल चंद्रशेखर (टेबले टेनिस) आणि इतर अनेक जण आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांचा आठव सतत येतोच.
आता दुसरी कोरोनाची लाट ओसरत आहे. तिसरी लाट येणार नाही अशी अपेक्षा करू या. क्रीडा क्षेत्राला (आणि अन्यही) आणखी मोहरे गमावणे परवडणारे नाही.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता! पुरुषही देणार बाळाला जन्म!! कसं काय?

Next Post

आरोग्य टीप्स : जांभूळ खाण्याचे हे आहेत फायदे

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
jamun 2

आरोग्य टीप्स : जांभूळ खाण्याचे हे आहेत फायदे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011