रविवार, सप्टेंबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – तरंग – जीएसटी … एक कळीचा मुद्दा !

by Gautam Sancheti
जून 27, 2021 | 10:20 am
in इतर
0

जीएसटी … एक कळीचा मुद्दा !

वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी हा अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. कारण, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे या करावरुन एकमेका समोर उभे ठाकले आहेत. पैशावाचून काहीच होत नाही, हे वारंवार बोलले जाते आणि त्यावरुन सिद्धही होते. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभिर्याने बघण्याची गरज आहे. 
पानवलकर e1624120000610
लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत.
ब्लॉग – https://ashokpanvalkar.com
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीएसटीची थकबाकी आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यानंतर अर्धा तास पंतप्रधानांसोबत खासगीतही चर्चा केली. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे निष्पन्न होत आहे. गेल्या वर्षभराची आणि या वर्षातील दोन महिन्यांची मिळून जीएसटी परताव्यापोटीची जवळपास ३३ हजार कोटी रुपयांची थकबाकी असताना, केवळ चार हजार कोटी रुपये केंद्राने राज्याच्या झोळीत टाकले आहेत. वेतन आणि पेन्शन यापोटी राज्य सरकारला महिन्याला सुमारे १२ हजार कोटी रुपये मोजावे लागत असताना, आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला चार हजार कोटी रुपयांचा निधी तुटपुंजा असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या प्रशासनातून उमटत आहे….
आजच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये संजय व्हनमाने यांनी ही बातमी दिली आहे. या बातमीमुळे केंद्र सरकारचे आर्थिक प्रश्न , हक्काचा जीएसटी (वस्तू व सेवा कर) परतावा न मिळाल्याने राज्यांची होणारी अडचण, त्यातून ताणले गेलेले केंद्र -राज्य संबंध असे प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत. केंद्र सरकारने २०१७ साली जीएसटी आणला. विक्री कर, व्हॅट यांसारखे कर रद्द  करून एकच जीएसटी कर आणल्यास सर्वांचाच फायदा होईल असे सांगून केंद्राने हा जीएसटी आणला. बुडालेल्या विक्रीकर, व्हॅट आदी करांच्या भरपाईपोटी राज्यांना ठराविक रक्कम देण्यात येईल आणि दरवर्षी त्यात १४ टक्क्यांची वाढ केली जाईल असे संबंधित कायद्यात म्हटले होते. २०१९ पर्यंत ही व्यवस्था बऱ्यापैकी रुळावर होती. नंतर कोरोना आला, केंद्र व राज्यांचा महसूल रोडावला आणि जीएसटी परतावा यंत्रणा कोलमडली. २०२०, २०२१ मध्ये केंद्राने राज्यांना देय असलेल्या रकमेच्या थकबाकीत दरवर्षी वाढच होत राहिली. गेल्या महिन्याची स्थिती अशी होती की केंद्राने राज्यांना १,१०,००० कोटी रुपये देऊनसुद्धा थकबाकी जवळपास ६३ हजार कोटी रुपये होती. 
सगळी राज्ये केंद्राकडे वारंवार या थकबाकीची मागणी  करत होती. कारण महाराष्ट्रासह सगळ्या राज्यांवर कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे बराच आर्थिक ताण आला होता. याच संदर्भात काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पात्र लिहिले आणि कोरोना प्रतिबंधक लसी, पीपीई किट व संबंधित वस्तूंवरील जीएसटीमध्ये कपात करण्याची मागणी केली. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तांत्रिक कारणे सांगून कोरोना प्रतिबंधक लसींवरील जीएसटी कमी करण्यात असमर्थता दर्शवली. मग पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यानी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की मागच्या ऑक्टोबरनंतर जीएसटी परिषदेची बैठकच झालेली नाही. ती घ्या आणि या प्रश्नांवर चर्चा करा. अखेर जीएसटी परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी राज्ये खंबीर भूमिका घेऊन सज्ज होती. पंजाबच्या अर्थमंत्र्यानी जीएसटी परिषदेवर आधीच टीका केल्याने वाद तापला होताच. नंतर सर्व बिगर-भाजप राज्यांनी एकत्र येऊन परिषदेत काय भूमिका घ्यायची यावर विचारविनिमयही केला. कोरोना प्रतिबंधक लसींवरील जीएसटी कमी करा ही मागणी होतीच, पण मूळ प्रश्न केंद्राकडून येणारी थकबाकी व त्यात सतत होणारी वाढ आणि त्यामुळे राज्यांवर पडणारा अधिक बोजा हा प्रश्न प्राधान्याने चर्चिला गेला. 
modi udhhav
संग्रहित फोटो
राज्यांना देण्यात यावयाची ६३ हजार कोटींची थकबाकी केंद्राने दिली तर केंद्राकडे फक्त ३९४० कोटी रुपये उरतात असे सांगण्यात आले. एकट्या पंजाब राज्याची थकबाकी या रकमेच्या दुप्पट आहे. महाराष्ट्रात यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी असे म्हटले होते, की फेब्रुवारी २०२१ अखेरीस महाराष्ट्राची जीएसटी थकबाकी ४६,९५० कोटी रुपयांची होती. नंतर केंद्राने ६,१४० कोटी रुपये दिले. शिवाय ११,५२० कोटी रुपये कर्जाच्या स्वरूपात दिले. म्हणजे बाकी २९,२९० कोटी रुपयांची उरली.
कोरोनामुळे जबर फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र वरच्या स्थानावर आहे. मागे आलेल्या एका बातमीनुसार कोरोना काळात इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्राचाही महसूल कमालीचा घसरला. त्यामुळे, राज्यांतर्गत उत्पन्न कमी आणि केंद्राची थकबाकी मात्र वाढती अशा पेचात अनेक राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रही सापडला. परंतु, ”राज्याला २०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्राकडून २४ हजार ३०६ कोटी रुपयांची रक्कम जीएसटी भरपाईपोटी मिळणे बाकी होते. या वर्षातील एप्रिल आणि मे महिन्यांचे आणखी नऊ हजार कोटी रुपये असे सर्व मिळून ३३ हजार ३०६ कोटी रुपयांची थकबाकी होती. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ८ जूनला नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्याच्या विविध प्रश्नांवर भेट घेतली होती. त्यावेळी जीएसटीची थकबाकी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जीएसटी परिषदेत परताव्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. याशिवाय राज्य सरकारने केंद्राशी अनेकदा पत्रव्यवहार केला होता.
विशेष म्हणजे, दिल्लीतील या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास अर्धा तास स्वतंत्र चर्चा झाली होती. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना अर्धा तास वेळ दिल्याने दोघांमधील संबंध आता दृढ होणार, केंद्राकडून राज्याला करोना संकटात मजबूत आधार मिळणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. मात्र या चर्चेत फारसे तथ्य नसल्याचे दिसून आले आहे.”, असे संजय व्हनमाने यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे. 
हा सारा प्रश्न फक्त राज्यांच्या बाजूने पाहण्यात अर्थ नाही. राज्यांची बाजू खरी आहेच. परंतु, केंद्राचीही महसूल घटला आहे.  २०१७ मध्ये जीएसटी आला तेव्हाच काही राज्यांनी ही यंत्रणा नीट चालेल का अशी शंका व्यक्त केली होती.
कोणतेही राज्य आपला महसूल गमावून केंद्रावर अवलंबून राहण्यास सहजासहजी राजी होणार नाही, हे उघड होते. त्यामुळे काही राज्यांनी लगेच तर बऱ्याच राज्यांनी नाईलाजाने जीएसटीला मान्यता दिली. २०१७मध्ये सांगितल्याप्रमाणे ही व्यवस्था २०२२पर्यंतच लागू राहणार आहे. नंतर काय हा प्रश्न आहेच. २०२३ साली लोकसभा निवडणुका आहेत. त्याआधी जीएसटीवरून मोठे वादंग होणार अशी चिन्हे आताच दिसायला लागली आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लस घ्यायची नाही म्हणून पत्नीचे आधार कार्ड घेऊन तो चक्क झाडावर जाऊन बसला! पुढं काय झालं?

Next Post

आरोग्य टीप्स : पावसाळ्यात असे सांभाळा आरोग्य; आहारात असू द्या हे पदार्थ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फसवणुकीच्या प्रकरणात सुनावली ४ वर्षांची शिक्षा…

सप्टेंबर 21, 2025
bullete train
महत्त्वाच्या बातम्या

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा केव्हा पूर्ण होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली ही माहिती

सप्टेंबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी रुपयांचा निधी…

सप्टेंबर 21, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

भारतीय शिष्टमंडळ या तारखेला अमेरिकेला भेट देणार…या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 21, 2025
G1Sin8kW4AAjERO e1758416853507
मुख्य बातमी

दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर…असा आहे प्रवास

सप्टेंबर 21, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणीची मंत्रालयातून गंभीर दखल, गुन्हा दाखल, तिघांना अटक

सप्टेंबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, २१ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 20, 2025
cricket
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये नोव्हेंबर मध्ये दोन रणजी सामन्यांचा थरार….हे सामनेही होणार

सप्टेंबर 20, 2025
Next Post

आरोग्य टीप्स : पावसाळ्यात असे सांभाळा आरोग्य; आहारात असू द्या हे पदार्थ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011