शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा – ‘ब्रह्मगिरी, गंगोत्री से कम नही’

नोव्हेंबर 6, 2021 | 5:18 am
in इतर
0
brahmgiri

ब्रह्मगिरी, गंगोत्री से कम नही

ब्रह्मगिरीबाबत बोलायचं ठरलं तर डॉ. राजेन्द्र सिंह यांचे वाक्य आठवतं “ब्रह्मगिरी, गंगोत्री से कम नही है”. जितकं महत्त्व गंगोत्रीला आहे, तितकंच महत्त्व ब्रह्मगिरीला आहे. पण, आपण ते आजवर तरी जाणून घेतलेले नाही.

rajesh pandit
राजेश पंडित
अध्यक्ष, नमामी गोदा फाऊंडेशन
मो. ७३०४१२००७७

सहा राज्यांची जीवनदायिनी गोदावरी तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणारी वैतरणा यांचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. पौराणिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा असलेला ब्रह्मगिरी पर्वत आपल्या नाशिक जिल्ह्यात असल्यामुळे आपली जबाबदारी तर अजूनच वाढते. ब्रह्मगिरीमुळे गोदावरी आहे, वैतरणा आहे आणि त्यांच्यामुळे आपण आहोत, हे विसरून चालणार नाही. मध्यंतरीच्या काळात ब्रह्मगिरीवर जो उत्खननाचा प्रकार घडला तो अतिशय गंभीर होता.

याचसंदर्भात सहा राज्यांचे नागरिक एकत्र येऊन राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली गेली. डॉ. राजेंद्र सिंग यांनी त्याच्यात मार्गदर्शन केलं. माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी पर्यावरणाचे रक्षण व्हावं आणि विकासही साधता यावा यासाठी टास्क फोर्स निर्मिती केली. या टास्कफोर्समध्ये समाजातील सर्व थरातील संबंधित नागरिक म्हणजे पर्यावरण प्रेमी, विकासक या सर्वांना एकत्र करून कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंग हे नाशिकला आले. जिल्हाधिकारी आणि समाजातील अनेक मान्यवर यांच्याशी विचारमंथन होऊन या विषयाबद्दल पुढील दिशा कशी असावी याचा एक कृती आराखडा तयार झाला. सर्वांनी मिळून एक घोषवाक्य तयार केले “ब्रह्मगिरी की हरियाली और गोदावरी की पवित्रता” या विषयावर आता काम करायचे आहे.

संत म्हणजे त्यात्या क्षेत्रातील तज्ज्ञ, शासन आणि समाज या सर्वांना एकत्र करून जर हे काम झाले तर ते कायमस्वरूपी शाश्वत असेल, असे डॉ. राजेंद्र सिंग यांनी सांगितले. ब्रह्मगिरी की हरियाली और गोदावरी की पवित्रता म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ब्रह्मगिरी की हरियाली म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावर केवळ वृक्षारोपण करणं नव्हे तर तिथे नैसर्गिक पद्धतीने जंगल निर्माण करणं आहे. याबाबत सध्याचे गोव्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांचे मार्गदर्शन फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या काळी धान्य देखील जंगलातच उगायचं, नंतर जंगलतोड करून शेती करायला सुरुवात झाली.

जोशी यांच्या मते आता आपण लहान लहान मुलांच्या पर्यावरण सहली काढायला हव्या. ती लहान लहान मुले त्यांच्या त्यांच्या घरून त्यांना हवा असलेले मूठभर धान्य घेऊन येतील. त्यांना जेवढे शक्य आहे, तेवढे ते डोंगरांवर चढतील. तसेच, आपल्या जवळील धान्य ते डोंगराच्या विविध भागामध्ये टाकतील. धान्य मिळतं म्हणून पक्ष्यांचा अधिवास तेथे वाढेल. जे धान्य पक्षी खाणार नाहीत त्याचे गवत तयार होईल. पक्षी ठरवतात कुठलं झाड कुठे लावायला पाहिजे. कारण, आपल्या चोचीत दाणे पकडून तेच इतस्तः ते देणे पेरतात. उदाहरणच द्यायचे तर आपल्या गच्चीवर आलेले पिंपळाचं झाड काँक्रीटमध्ये कसं येतं. अगदी ॲसिड टाकून ते काढावे लागते. पक्ष्यांनी केलेल्या वृक्षारोपणाची फार देखभाल करायची गरज नसते. ते निसर्गतः वाढते. म्हणजे पक्ष्यांना किती उत्कृष्ट जाण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.

ब्रह्मगिरीला हिरवेगार करण्यासाठी आपण पक्ष्यांच्या वृक्षारोपणाची पद्धती अवलंबायला हवी. आपल्या घरामध्ये जे आपण फळ खातो त्यांच्या बिया देखील ठराविक सीझनमध्ये सीड बॉल्सच्या रूपात तयार करता येतील. तसेच, हेच सीड बॉल्स सहली काढून ब्रह्मगिरी परिसरात टाकता येतील. यात सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रह्मगिरीचा परिसर  इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर व्हायला हवा. जेणेकरून माणसांचा वावर कमी होईल. तसेच, एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला माणसांचा वावर कमी होतो, तेथे जंगल आपोआप तयार होते.

जंगल ही नद्यांची जननी आहे, असे म्हणतात. त्यामुळे माती अडवा, पाणी जिरवा नैसर्गिक पद्धतीने होते. भूजल पातळी वाढते आणि नद्या बारामही व्हायला सुरुवात होते. आपल्या ब्रह्मगिरीच्या उताराचा अभ्यास करून लोकायुक्त अंबादास जोशी यांनी अनेक उपाय सुचविले आहेत. जे अगदी सहज करता येण्याजोगे आणि छोटे-छोटे आहेत. दीड बाय दीड बाय दीडच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे लोकसहभागातून करायचे. जेणेकरून वेगाने वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होईल. आणि हळूहळू मातीचा थर वाढेल. जेव्हा या मातीच्या थराचा संपर्क पावसाच्या पाण्याशी येतो, त्यावेळी जंगल तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते.

ब्रह्मगिरीवर पुर्वीसारखे जंगल तयार झाले तर गोदावरी सुद्धा बारामही वहायला सुरुवात होईल. पवित्र गोदावरी म्हणजे अविरल, निर्मल, स्वतंत्र अशी गोदावरी. जंगलामुळे गोदावरी अविरतपणे वाढण्यास मदत होईल. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे निर्मलता. सध्या त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे निर्मलतेच्या दृष्टिकोनातून प्रदूषण ही फार मोठी समस्या आहे. मलजलामुळे होणारे प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव यामुळे मोठे प्रदूषण होते. त्यात प्लास्टिकचा वाटा खूप मोठा आहे.

राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी नुकतेच फार महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे. त्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा आहे. गोदावरी मध्ये मलजल मिसळू नये यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकायला हवी. तसेच, नदीपात्रामध्ये मध्ये मिसळणारे मलजल वेगळे करून त्यावर योग्य त्या पद्धतीने ट्रीटमेंट करून त्या पाण्याचा पुनर्वापर होणं अपेक्षित आहे. कुठल्याही पद्धतीचा घनकचरा गोदावरी मध्ये जायला नको. तेव्हाच गोदावरीच्या निर्मलतेला खर्‍या अर्थाने सुरुवात होईल. सध्या गोदावरीच्या नदीपात्रातून मलजल वाहते आहे. आपली सर्वांची साथ जर मिळाली तर ब्रह्मगिरी की हरियाली और गोदावरी की पवित्रता सहज शक्य आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दहशतवाद्यांशी इम्रानची डील; तुरुंगातून बाहेर येत लढवणार थेट निवडणूक

Next Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या ६९४; महानगरपालिका क्षेत्रात २९० तर पंधरा तालुक्यात ३६९ रुग्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या ६९४; महानगरपालिका क्षेत्रात २९० तर पंधरा तालुक्यात ३६९ रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011