परिपूर्ण किल्ला : वेताळगड
महाराष्ट्र म्हणजे दुर्गांचा देश. महाराष्ट्राची भूराजकीय जडणघडण झाली आहे ती या गड-किल्ल्यांमुळेच. सर्व प्रकारचे आणि रचनेचे दुर्ग आपल्याला महाराष्ट्रात मुख्य सह्याद्री डोंगररांग, उर्वरीत प्रदेश तसंच समुद्रातही बघायला मिळतात. काही प्रमुख किल्ले सोडले तर आडवाटेवरील अनेक दुर्गांच्या नशिबी उपेक्षा आलेली आहे. कालौघात अनेक किल्ल्यांवरील गडावशेष नष्ट झालेले दिसतात. उत्साहाने किल्ला बघण्यासाठी गेलेल्या जिज्ञासुंच्या नजरेस येतात ती पडकी प्रवेशद्वारं, ढासळलेली तटबंदी, उध्वस्त इमारतींचे उरलेले जोते वगैरे वगैरे… पण त्यातही किल्ला म्हणून बघावे असे काही शिलेदार आजही गतवैभवाची साक्ष देत मानाने उभे आहेत. एक परिपूर्ण किल्ला म्हणून बघावा असा अजिंठा रांगेतील वेताळवाडी किल्ला त्याच्या भेटीस येणार्या प्रत्येकाला तृप्त करतो.

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक