अजिंठा रांगेतील राजा किल्ले अंतुर
साधारण सापुतारा-हातगडापासून सुरु होणारी सातमाळा पर्वतरांग मनमाड पर्यंत धावत येते. आणि पुढे मनमाड-चाळीसगाव मार्गे थेट औरंगाबाद जिल्ह्यात जाणार्या ‘अजिंठा’ रांगेचा हात पकडते. चाळीसगावपासून पुढे औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या गौताळा अभयारण्याच्या दाट वनराईत या अजिंठा रांगेचे भक्कम, बळकट, रांगडे, श्रीमंत आणि गडावषेशांचे अलंकार लेवून नटलेले महत्त्वाचे किल्ले लपलेले आहेत. त्यात प्रथम मान जातो तो अंतुर किल्ल्याला.

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक