दुर्ग सुतोंडा
सातमाळेला लागून पुढे जाणारी अजिंठा पर्वतरांग ही नाशिक जिल्ह्याला जळगाव आणि मराठवाड्यापासून विलग करते. या रांगेतला सर्वांत मुख्य किल्ला म्हणजे अंतुर आहे. अंतुरच्या भेटीला गेलं म्हणजे त्याच्या प्रभावळीत असणारे लोंझा आणि सुतोंडा या किल्ल्यांनाही आवर्जुन भेट दिली पाहिजे. तसंच पुढे दोन दमदार दुर्ग वेताळवाडी आणि वैशागड आपल्याला साद घालत असतात. एकंदरीत संपूर्ण अजिंठा रांग अस्सल भटक्यांसाठी एक परिपूर्ण डोंगरयात्रा ठरते. या यात्रेतील दुर्ग सुतोंडा म्हणजे किल्ल्यांवरील जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना होय…

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक