बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – भन्नाट – रिव्हिगो

by Gautam Sancheti
जून 7, 2021 | 5:55 am
in इतर
0
ESjuZqAUYAATMnp

इंडिया दर्पण विशेष – भन्नाट – रिव्हिगो 

“ट्रक ड्रायव्हर देखील सकाळी कामावर जाऊन संध्याकाळी आपल्या घरी परत येऊ शकतो” विश्वास बसत नाही ना, पण ही गोष्ट खरी करून दाखवली आहे रिविगो यास स्टार्टअप कंपनीने आणि यातून शेकडो कोटींचा व्यवसाय देखील यशस्वीरित्या उभा केला आहे दीपक गर्ग आणि गझल कालरा यांनी. याच अनोख्या स्टार्टअपची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.
Dr. Prasad Photo
प्रा. डॉ. प्रसाद जोशी
(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
दीपक गर्ग मॅकेंझी  कन्सल्टन्सी या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये एका दशकापासून अधिक काळ काम करत होता. भारतीय अर्थव्यवस्थेचा त्याचा बारकाईने अभ्यास होता आणि त्यातच दळणवळण व ऑटोमोबाइल क्षेत्र या संबंधित संशोधनाचे काम त्याच्याकडे असत. आणि असेच संशोधन करत असताना त्याच्या एक लक्षात आलं की भारतीय अर्थव्यवस्था ज्या पटीने वाढते आहे त्याच गतीने ट्रक ची विक्री होत नाही. हे त्याच्या साठी आश्चर्यकारक होतं. करण गतिमान पद्धतीने वाढती अर्थव्यवस्था व दळणवळणाच्या वाढत्या गरजा असून देखील ट्रकच्या मागणीमध्ये वाढ का होत नाही याचा अभ्यास करू लागला.
यासाठी त्याने अनेक ट्रक मालकांची भेट घेतली तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं मागणी असून देखील ट्रक ड्रायव्हर उपलब्ध होत नसल्याने नवीन ट्रक विकत घेण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. एकीकडे जनसंख्या सोबतच वाढती बेरोजगारी आहे तर दुसरीकडे ड्रायव्हिंग कौशल्य असलेले ट्रक ड्रायव्हर मिळत नाही हा विरोधाभास का? आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्याने आपल्या नोकरीतून काहीकाळ रजा घेऊन स्वतः प्रवास करण्याचं आणि ट्रक ड्रायव्हर ची प्रश्न समजावून घेण्याचा निर्णय घेतला.

DlhAdIRX4AAOyak

त्याच दरम्यान दीपक च्या मित्राची पत्नी गझल कालरा ही व्यवस्थापन व समाज धोरणे या विषयात उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेतून भारतात परतली होती. दीपक असं काही करणार आहे हे आपल्या पतीकडून समजल्यानंतर तिने दिपकची भेट घेण्याचा निर्णय घेतला. आणि दोघांचेही विचार आणि संशोधनाच्या अभ्यासाचे विषय जुळतात असे लक्षात आल्यावर दोघांनीही अभ्यास सोबत करण्याचं ठरवलं. दोघेही भारतीय हायवे वरील ट्रक ड्रायव्हर्स च्या भेटी घेऊ लागले. आणि त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी जाणून घेऊ लागले. यासोबतच गावोगावच्या तरुण बेरोजगारांना भेटून ट्रक ड्रायव्हर चे काम का करत नाही असा देखील प्रश्न त्यांनी विचारला. यावर मिळालेले उत्तर फारच निराशाजनक होते. अनेकांच्या मते ट्रक ड्रायव्हर होणे म्हणजे आपले आयुष्य रस्त्यांवरच काढणे होय तर काहींच्या मते ट्रक ड्रायव्हर चे काम करणे हे अतिशय हलके समजले जाणारे काम आहे.
ट्रक ड्रायव्हर्स चे प्रश्न जाणून घेत असताना काही प्रमुख आढळलेले मुद्दे पुढील प्रमाणे. ट्रक ड्रायव्हर वर्षातून केवळ तीन-चार वेळेलाच आपल्या घरी येऊ शकतात, ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यात जोखीम फार मोठ्या प्रमाणात असते, ट्रक ड्रायव्हर्स विवाह साठी मुलगी कोणी देत नाही, एच आय व्ही सारख्या संसर्गजन्य रोग आणि मुळे अनेक ट्रक ड्रायव्हर्स त्रस्त असतात, जास्त अंतर कमी वेळेत प्रवास करण्यासाठी मालकांकडून  दिले जाणारे प्रेशर आदी.
समाजातील बेरोजगारांचे आणि ट्रक ड्रायव्हर प्रश्न समजून घेतल्यानंतर गझल आणि दीपक यांनी ट्रक ड्रायव्हर्स च्या जीवनात आमूलाग्र व मानवी बदलण्याचा निर्णय घेतला. आणि यातूनच आपला स्वतःचा व्यवसायदेखील उभा करण्याचा मार्ग शोधला.

D1I8SJgWsAE8wWZ

यांच्या मते जर आपण ट्रक ड्रायव्हरला त्याच दिवशी घरी पाठवू शकलो तर त्याच्या आयुष्यातील बहुतांश प्रश्न सुटतील ट्रक ड्रायव्हर देखील एका सामान्य माणसा प्रमाणे आपले जीवन व्यतीत करू लागतील. आणि यातून उभी राहिली रिविगो नावाची लॉजिस्टिक्स स्टार्टअप कंपनी.
2014 साली स्थापन झालेल्या या कंपनीचे पहिले उद्दिष्ट म्हणजे ट्रक ड्रायव्हर एका टप्प्यात जास्तीत जास्त चार ते पाच तासांचा प्रवास करेल. याकरता एका ट्रकच्या पुर्ण प्रवासाला एक ड्रायव्हर अशी व्यवस्था न लावता संपूर्ण रूट वर प्रत्येक साडेचार तासाच्या अंतरावर म्हणजेच सुमारे 70 किलोमीटर  अंतरावर रिविगोचे सेंटर असेल. या सेंटरला पोहोचल्यानंतर ड्रायव्हर बदली होतील आणि पहिला ड्रायव्हर 45 मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा दुसऱ्या ट्रकवर आपल्या घराकडे परत येईल. म्हणजे दोन्हीकडचा प्रवास गृहीत धरता दहा तासांपेक्षा जास्त दिवसाला घराबाहेर राहावे लागणार नाही. आणि यामुळे ड्रायव्हरच्या आयुष्यातील बहुतांश प्रश्न सुटतील या विश्वासावरच या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
रिविगो यांच्यासमोर इतर ट्रक्स भाड्याने घेऊन त्यांचा वापर करण्याचा देखील मार्ग उपलब्ध होता. परंतु दुसऱ्याच्या ट्रक्सवर दुसरे ड्रायव्हर्स आणि तेही वेगवेगळ्या ठिकाणाहून येतील. यामुळे कंपनीला भांडवल कमी झाले असते परंतु ड्रायव्हरची जीवन सुधारण्याचा मूळ उद्देश पूर्ण झाला नसता. आणि म्हणून कंपनीने स्वतःच्या ट्रक्स विकत घेण्याचा निर्णय घेतला.

D9f7LlPUcAIRTEd

रिविगो मध्ये ड्रायव्हर्सना पायलट म्हणून संबोधले जाते व तशाच धरतीवर सर्व ड्रायव्हर्सना युनिफॉर्म देखील देण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या आरोग्यासाठी व सुखा सुविधांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी ट्रक मध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. प्रत्येक ड्रायव्हरला मोबाईल मध्ये कंपनीचे ॲप इन्स्टॉल करून देण्यात आले आहे. हे ॲप अकरा प्रादेशिक भाषांमध्ये असून यात बहुतांश चित्रांचा वापर करण्यात आला आहे. ड्रायव्हर चे पेमेंट अगदी वेळेत करण्यात येते. कंपनीची सुरुवात झाल्यानंतर सहा महिन्यांनी सर्व ड्रायव्हरच्या पत्नी यांची भेट स्वतः दीपक व गजल यांनी घेतली. त्यावेळेला आपले पती रोज घरी येतात त्यामुळे सर्वजण अतिशय आनंदी होते.
ड्रायव्हर बाबत मानवते ने विचार करण्यासोबतच आपला व्यवसाय देखील उत्तम पद्धतीने उभारण्यासाठी पूर्ण विचार या दोघांनी केला आहे. तीन हजार ट्रक व 17000 शहरांपर्यंत वाहतूक सुविधा पुरविण्याची तयारी असून आजवर तीन हजारांहून अधिक ग्राहक जोडले गेले आहेत.
रिले पद्धतीने ड्रायव्हर्स बदलत असल्याकारणाने ड्रायव्हरच्या झोपेसाठी किंवा विश्रांतीसाठी होल्ड ची गरज नसल्यामुळे प्रवासाला लागणारा एकूण वेळ हा 50 टक्के होऊन देखील कमी झालेला आहे. आपल्या पहिल्या ग्राहकांचा अनुभव सांगताना गझल म्हणते दिल्ली ते पुणे या प्रवासाला सरासरी कुठलाही वाहतूक कंपनीकडून सात दिवस साधारण लागतात. पण कॉन्ट्रॅक्ट ठरवताना आम्हाला विचारण्यात आला की साधारण किती वेळेत ट्रक पोहोचेल तेव्हा आम्ही 24 तास असे सांगितल्यावर आमचे ग्राहक अचंबित झाले. आणि ते पाहून आम्ही म्हटलं की बफर म्हणून आपण छत्तीस तास धारूयात. आणि जेव्हा आमची ट्रक दिल्लीहून पुण्याला पोहोचली तेव्हा एकूण लागलेला वेळ हा केवळ 23 तास 36 मिनिटं होता. हे पाहून साऱ्यांनीच तोंडात बोटं घातले.
रिविगो चा ग्राहकांमध्ये सर्व प्रकारचे उद्योजक आहेत जसे ऑटोमोबाईल, केमिकल, कपडे, स्टील, इ. हा सर्व व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना आजवर 2 बड्या गुंतवणूकदारांकडून दोन टप्प्यांमध्ये साधारण 900 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्राप्त झाली आहे. केवळ व्यवसाय म्हणून नाही तर ट्रक ड्रायव्हर्स बाबत मानवी विचार केल्यानेच कंपनीचा सतत उत्कर्ष होताना दिसत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नवी कार घेताय? या महिन्यात येताय या सुपर मॉडेल कार

Next Post

जेईई, नीट प्रवेश परीक्षा होणार की नाही?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

जेईई, नीट प्रवेश परीक्षा होणार की नाही?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011