रांची (झारखंड) – महाराष्ट्रासह भारतातील सर्वच राज्यांत कोरोनाचे संकट गडद होत असून त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य शासन देखील चिंतेत आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणांमार्फत उपाययोजना करण्यात येत आहे. याच वेळी झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्यातील नागरिकांसह अनेक नेतेमंडळींनीही त्यांचे कौतुक केले आहे.
कोरोना काळात डॉक्टर योग्य काम करतात की नाही हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी एका डॉक्टरांना सर्व सामान्य रुग्ण म्हणून फोन केला, तेव्हा डॉक्टर खरोखरच योग्य काम करत असल्याचे दिसून आले.










