बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोळसा हवा असेल तर आधी हे करा; कोल इंडियाचे या ५ राज्यांना पत्र

by India Darpan
ऑक्टोबर 14, 2021 | 12:54 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
coal

नवी दिल्ली – देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकटाचे सावट असताना कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांकडे कोल इंडिया या सरकारी कंपनीचे २० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थान राज्य सरकारांना कोळसा मंत्रालयाने पत्र लिहून थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या आहेत.

देशात कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना जानेवारीपासून पत्र लिहून कोळशाचा साठा करण्याचा सल्ला दिला होता. परंतु अनेक राज्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. थकबाकी असतानाही केंद्राने राज्यांना कोळसा पुरवठा केला आहे. झारखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोळशाच्या खाणी आहेत. परंतु या राज्यांनी खूपच कमी कोळशाचे उत्खनन केले किंवा काहीच उत्खनन केले नाही.

राज्यांनी कोळशाचे उत्खनन न केल्याने तसेच कोल इंडियाकडून कोळसा खरेदी न केल्यानेही विजेचे संकट गंभीर झाले आहे, असे कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आग लागण्याच्या धोक्यामुळे कोळशाचा साठा केला जाऊ शकत नाही, असे कोळसा मंत्रालयाशी संबंधित अधिकार्यांनी सांगितले.

आयात कोळसा महागला
आयात कोळसा महागल्यामुळेही देशात कोळशाचे संकट वाढले आहे. एका वृत्तानुसार, मार्च २०२१ आयात कोळशाची किंमत ४२०० रुपये टन इतकी होती. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ती वाढून ११,५२० रुपये टन झाली. त्यामुळेसुद्धा विजेच्या उत्पादन व्यवस्थेत अडथळे आले. येत्या पाच दिवसांत कोळशाचे उत्पादन १.९४ लाख टनने वाढून २० लाख टन करण्यात येणार आहे, असे सरकारने सांगितले.

कोणाकडे किती थकबाकी
राज्ये – थकबाकी (कोटी रुपयांमध्ये)
महाराष्ट्र – ३१७६.१
उत्तर प्रदेश – २७४३.१
पश्चिम बंगाल – १९५८.६
तामिळनाडू – १२८१.७
राजस्थान – ७७४

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जत्रा हॉटेल समोरील महालक्ष्मी नगर भागात भरदिवसा घरफोडीत; चोरट्यांनी लंपास केला ४४ हजाराचा ऐवज

Next Post

पायलट असलेल्या आपल्या वडिलांना बघून चिमुरडीला झाला असा आनंद (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Capture 19

पायलट असलेल्या आपल्या वडिलांना बघून चिमुरडीला झाला असा आनंद (बघा व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011