शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भैय्याजी जोशी यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया…

by Gautam Sancheti
मार्च 6, 2025 | 4:30 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 19


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असे विधान केले. त्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. विधिमंडळातही विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात येणा-यांनी मराठी शिकलंच पाहिजे. मी भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य एेकलेलं नाही. त्यामुळे ते पूर्ण एेकून मी त्यावर बोलेन. पण, आमची सरकारची भूमिका काय आहे तर मुंबईची, महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाऱाष्ट्रात राहणा-या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. खरं म्हणजे माझ्या वक्तव्याचा संदर्भात भैय्याजींचं देखील काही दुमत असेल असे मला वाटत नाही असे फडणवीसांनी सांगितले.

महाविकास आघाडीने केला निषेध
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भैय्याजी जोशी यांनी मराठीविरोधी केलेल्या विधानाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकाजवळ निषेध केला तसेच हुतात्म्यांना अभिवादन करुन ही मुंबई तुटू देणार नसल्याची शपथ घेतली.

राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा- उध्दव ठाकरे
उध्दव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी – अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी किती विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकावून देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाषावर प्रांतरचना देशाची झाली. आता मुंबईची प्रांतरचना करत आहे. भैय्याजी जोशी चिल्लर माणूस आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा मी मुख्यमंत्री असताना केला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावे असे ठाकरे म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारक येथे केला निषेध…उध्दव ठाकरे यांनी केली ही मागणी

Next Post

महावितरण अभय योजना…नाशिक परिमंडलातील ९ हजार ७२४ ग्राहकांची थकबाकीतून मुक्ती, ११ कोटी ३३ लाख रुपयांचा केला भरणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
mahavitarn

महावितरण अभय योजना…नाशिक परिमंडलातील ९ हजार ७२४ ग्राहकांची थकबाकीतून मुक्ती, ११ कोटी ३३ लाख रुपयांचा केला भरणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011