शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वाल्मिक कराडच्या सरेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

by Gautam Sancheti
डिसेंबर 31, 2024 | 4:28 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
100 DAYS MEET 1 768x512 1


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. तीन आठवड्यांपासून तो फरार होता. सीआयडी आता त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या होऊन २२ दिवस उलटले आहे. या प्रकरणातही वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातही त्याची चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले की, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडाचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतिशील तपास केलेला आहे. त्यामुळे आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतील जे आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्याकरता वेगवेगळ्या टीम्स कामी लागलेल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही.

ते पुढे म्हणाले की, आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनाही मी आश्वासन दिले आहे की, तुम्ही काळजी करु नका. काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल याबाबत सगळी माहिती पोलिस देतील. ते पोलिसांचे काम आहे. पुराव्यांच्या आधारावर कोणालाही सोडणार नाही.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1874031919635333339

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आडगाव शिवारात घरफोडी…चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे केले लंपास

Next Post

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी मिळणार…१०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
मंत्री जयकुमार गोरे यांनी पदभार स्वीकारला 2 1024x683 1

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी मिळणार…१०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011