नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अरुणाचल प्रदेश आपला असल्याचा दावा करणाऱ्या चीनला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने म्हटले की, नाव बदलल्याने वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहील. वास्तविक, चीनने पुन्हा एकदा आपल्या नकाशात अरुणाचलशी संबंधित ठिकाणांची नावे बदलली आहेत.
चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नवीन नावे जाहीर केली. अरुणाचल प्रदेशावर चीन आपला दावा करत आहे. दोन भूभाग, दोन निवासी क्षेत्रे, पाच पर्वत शिखरे आणि दोन नद्यांसह 11 ठिकाणांची अधिकृत नावे चीनच्या मंत्रालयाने जाहीर केली. यावर भारताने आता जोरदार हल्ला चढवला आहे.
चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने आपल्या रेकॉर्डमध्ये अरुणाचल प्रदेशचे नाव बदलण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2017 मध्ये सहा आणि 2021 मध्ये 15 ठिकाणांची नावे चीनने जाहीर केली होती. मात्र, यापूर्वीही चीनकडून भारताकडून याबाबत सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. याआधी भारतानेही चीनचे असे पाऊल फेटाळून लावले होते. हे राज्य नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, असेही भारताने यापूर्वी म्हटले होते. नाव बदलून ही वस्तुस्थिती बदलणार नाही.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, चीन अशी नावे शोधत आहे ज्यामुळे वास्तव बदलणार नाही. आम्ही असे अहवाल पाहिले आहेत. चीनने असा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आम्ही ते साफ नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील. शोधलेली नावे देण्याचा प्रयत्न केल्याने हे वास्तव बदलणार नाही.’ यापूर्वी २०२१ मध्ये चीनने नावे बदलली होती तेव्हाही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
2017 मध्ये दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. चीनने त्यांच्या दौऱ्यावर टीका केली आणि काही दिवसांनी पहिल्यांदाच नाव बदलले. गेल्या काही वर्षांपासून चीन आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. 2017 मध्ये डोकलानवरून भारत आणि चीनच्या लष्करामध्ये वाद निर्माण झाला होता. याशिवाय भारत आणि चीनमध्ये व्यापाराबाबत तणाव निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांत भारताने अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.
https://twitter.com/MEAIndia/status/1643129268321550339?s=20
China Change 11 Names of Places of Arunachal Pradesh India Reaction