मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला महत्त्वाचे पत्र लिहीले आहे. “माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो”, अशी सुरुवात त्यांनी या पत्राची केली आहे. या पत्राचे कारण आहे ते त्यांचे मानेचे दुखणे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मान दुखीचा त्रास होत आहे. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेतले होते. मात्र, अद्यापही त्यांना बरे वाटत नाहीय. अखेर डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ते आज रुग्णालयात दाखल होणार आहेत. दोन ते तीन दिवस रुग्णालयात राहून योग्य ते उपचार घेणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लिहीलेले पत्र असे